शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

टोलवसुलीचे काम निविघ्नपणे सुरू

By admin | Updated: June 18, 2014 00:55 IST

कोल्हापूरकर टोल न देण्यावर ठाम

कोल्हापूर : शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. आंदोलन करायचेच असेल तर ते कायद्याच्या अधिपत्याखाली करावे, या पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी टोलनाक्यावर जाण्याचे टाळल्यामुळे आयआरबीची टोलवसुली आज, मंगळवारी काहीशी सुरळीत झाली. तथापि, टोल न देण्यावर वाहनधारक ठाम असल्याने टोलला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, टोलविरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगत कृती समितीच्या नेत्यांनी कोणीही वाहनधारकाने टोल देऊ नये, असे आवाहन केले आहे. शहरातील सर्वच म्हणजे नऊ नाक्यांवर आज, मंगळवारी दिवसभर टोलवसुली सुरू होती; परंतु अनेक वाहनधारक नाक्यावर जाताच ‘आम्ही टोल देणार नाही’ असे बिनदिक्कतपणे ठणकावून सांगत होते. आयआरबीचे कर्मचारी नाक्यावर वाहने अडवीत होते. वाहनधारकांकडे टोलची मागणी करीत होते. थोडावेळ वाहने नाक्यावर थांबवली जात होती; पण वाहनधारक टोल देणार नाहीच, असे सांगत होते. शेवटी कर्मचारीही कोणताही वाद उत्पन्न होणार नाही याची दक्षता घेत, थोड्या वेळाने वाहनांना जाऊ देत होते. कृती समितीने टोल देऊ नये असे आवाहन केले आहे. वाहनधारकही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभरात टोलनाक्यांवर कोठेही वादावादी झाल्याचे वृत्त नाही.