शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टोलप्रश्नी शिवसेनेनेही केले हात वर

By admin | Updated: December 21, 2014 00:10 IST

कोल्हापूरशी दगाबाजी : आता ‘आमदार’ काय करणार?

विश्वास पाटील / कोल्हापूर सरसकट टोल रद्द करण्यात अडचणी आहेत, असे सांगून ज्या नाक्यांची टोलवसुलीची मुदत संपली आहे, तिथेच वसुली थांबविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याने कोल्हापूरच्या टोलप्रश्नात आता शिवसेनेनेही हात वर केल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर तासातच हीच भूमिका जाहीरपणे घेतली. सत्ताधारी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या सुरात सूर मिसळल्याने टोलचे भूत मानगुटीवरून उतरण्याची शक्यता धूसर झाली आहे. भाजपपेक्षा शिवसेना टोलच्या आंदोलनात सुरुवातीपासूनच अधिक आक्रमकपणे सहभागी झाली. आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्यासह प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर हे या आंदोलनात सातत्याने अग्रभागी राहिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणूक प्रचारात २ आॅक्टोबरला पेटाळा मैदानावर सभा झाली. त्या सभेतही पक्षाने ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही भूमिका जाहीरपणे मांडली. कोल्हापूरने शिवसेनेला विधानसभेत भरभरून यश दिले. आता त्याच पक्षाकडे या खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद आले. त्यामुळे त्यांची टोलमुक्त महाराष्ट्र राहू दे, किमान ‘टोलमुक्त कोल्हापूर’ तरी करण्याची जबाबदारी होती; परंतु आता या पक्षाचे मंत्री मात्र त्या मुद्द्यावरून मिळमिळीत भूमिका घेत आहेत. नागपूरला अधिवेशनादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत थेट टोल रद्द केल्यास मोठ्या प्रमाणावर कोर्टकज्जे होतील आणि सरकारला मोठ्या रकमेची भरपाई द्यावी लागेल, असे म्हटले आहे. पक्षाच्या मंत्र्यांनीच अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेचे आमदार आता काय करणार, अशी विचारणा होऊ लागली आहे. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील हीच भूमिका मांडत होते. टोलचे धोरण देशभरात स्वीकारल्याने एका शहरापुरती माघार घेता येणार नाही, असे मागच्या सरकारचे म्हणणे होते. त्यांनी टोल रद्द केला नाही म्हणून त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना फटका बसला; परंतु ज्यांनी टोल रद्द करतो म्हणून सांगून निवडणूक लढविली, तेच आता उलट भूमिका घेत आहेत; त्यामुळे या दोन्ही पक्षांना कोल्हापूरकरांनी काय प्रायश्चित्त द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली. एन्रॉन समुद्रात बुडवितो म्हणणाऱ्यांनीच सत्तेत आल्यावर एन्रॉनचे पुनरुज्जीवन केले. तसाच अनुभव आता टोल बाबतीत येत आहे. राज्य सरकारच आता टोल रद्द करण्यात अडचणी असल्याचे जाहीरपणे सांगू लागल्यावर आयआरबी कंपनीच्या टोलनाक्यांवरील वसुलीसाठीच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे. आता पुढे काय..? टोलविरोधी आंदोलनाचा शेवट काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला. दोन्ही काँग्रेसवाल्यांची सत्ता गेल्याने ते हतबल झाले. त्यात आंदोलनाची मानसिकता नाही. भाजप-शिवसेना सत्ताधारी झाल्याने त्यांना आंदोलनही करता येत नाही व प्रश्नही सोडवायला ते तयार नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या टोलविरोधी कृती समितीचे नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, निवास साळोखे यांच्या हिमतीवर आता आंदोलनाचे भवितव्य अवलंबून आहे.