शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

‘राजाराम’च्या सत्तेच्या भवितव्याचा आज फैसला

By admin | Updated: April 19, 2015 01:13 IST

सात तालुक्यांत ५६ केंद्रांवर मतदान : १९ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात, १२ हजार ६२४ एकूण मतदार

कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) मतदान होणार आहे. यासाठी सात तालुक्यांतील ५६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. १९ संचालक निवडीसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. तर १२ हजार ६२४ एकूण मतदार आहेत. दरम्यान, आज एस. टी. बस व जीपगाड्यांमधून निवडणूक केंद्रांवर मतदान साहित्य पाठविण्यात आले. ‘अ’ वर्ग उत्पादक सभासद मतदारसंघातील गट क्र. १ मध्ये इचलकरंजी, पट्टणकोडोली, हुपरी, रुई, माणगाव व रुकडी अशी सहा केंद्रे हातकणंगले तालुक्यात व गट क्र. २ मध्ये भेंडवडे, खोची, सावर्डे, वडगाव, लाटवडे, नरंदे, कुंभोज, टोप, नागाव, हेर्ले, चोकाक अशी १४ मतदान केंद्रे आहेत. गट क्र. ३ मध्ये शिये, भुयेवाडी, वडणगे, निगवे, चिखली, पोहाळे, ठाणे, यवलूज, पन्हाळा, सासने विद्यालय अशा १२ केंद्रांचा समावेश आहे. गट क्र. ४ मध्ये पुलाची शिरोली, मुडशिंगी, वसगडे, वाशी, कळंबे तर्फ ठाणे अशा गावांचा समावेश आहे. गट क्र. ५ मध्ये कसबा बावडा, उचगाव, आदी गावातील पाच मतदान केंद्रांचा सहभाग आहे. गट क्र. ६ मध्ये कांडगाव, साळवण, कडवे, कसबा तारळे, राधानगरी, धामोड अशा आठ केंद्रांचा समावेश आहे. संस्था गटात एकूण १३६ मतदार आहेत. यासाठी कारखाना कार्यस्थळावर मतदान घेण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, एक पोलीसही तैनात करण्यात आला आहे. सात झोनल आॅफिसर असून, निवडणूक अधिकारी संजय पवार, सहा. निवडणूक अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, धनंजय पाटील हे संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत आहेत. दरम्यान, मतदान केंद्रांवर सायंकाळी साहित्य पोहोचल्यावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी बुथ लावण्यास सुरुवात केली. केंद्रावर सूचना फलक, टेबलांची मांडणी करण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३५० कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यापैकी काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. (प्रतिनिधी)