शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी आजपासून पाच रुपयांत जेवण

By admin | Updated: May 1, 2017 00:12 IST

सांगली बाजार समितीचा उपक्रम : पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांच्याहस्ते योजनेस प्रारंभ होणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बीडच्या धर्तीवर अवघ्या पाच रुपयांत शेतकऱ्यांना जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्रदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते होत आहे. जिल्ह्यासह परराज्यातून मार्केट यार्डात येणाऱ्या दररोज पाचशेवर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पतंगराव कदम आहेत. यावेळी खासदार संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, प्रतीक पाटील, महापौर हारूण शिकलगार, जयश्रीताई मदन पाटील, विशाल पाटील, दिनकरतात्या पाटील, संभाजी पवार, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पणनचे कार्यकारी संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, सरव्यवस्थापक मिलिंद आकरे उपस्थित राहणार आहेत. सांगलीची हळद, गूळ आणि बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ आहे. मार्केट यार्डात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह परराज्यातील शेतकरी शेतीमालाच्या विक्रीसाठी येतात. दररोज किमान पाचशे शेतकरी मार्केट यार्डात येत असतात. याशिवाय हंगामात त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची संख्या असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची सांगलीत जेवणाची गैरसोय होत असते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अवघ्या पाच रुपयांत पोटभर जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती आणि अडते यांच्याकडून जेवणासाठी येणारा हा खर्च केला जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जेवणासाठी तीस रुपये खर्च येत असला तरी, त्यांच्याकडून अवघे पाच रुपयेच घेतले जाणार आहे. उर्वरित रक्कम सांगली बाजार समितीकडून खर्च केली जाईल. सध्या काही शेतकऱ्यांना व्यापारी जेवण देतात, मात्र अनेक शेतकऱ्यांचे जेवणासाठी हाल होत असल्याचेही दिसून आले आहे. शेतकऱ्यांना जेवण देण्याच्या निर्णयास सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाने सहमती दर्शविली. आता हा उपक्रम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)बीड बाजार समितीच्या धर्तीवर प्रयोगबीड कृषी बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना पाच रुपयांत जेवण दिले जाते. त्याच धर्तीवर सांगली बाजार समितीने धाडसी निर्णय घेतला आहे. जेवणामध्ये चपाती, भाजी, आमटी, भात असा मेनू राहणार आहे. बाहेरुन येणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवणाअभावी हाल होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.