शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आजपासून पाच रुपयांत जेवण

By admin | Updated: May 1, 2017 00:12 IST

सांगली बाजार समितीचा उपक्रम : पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांच्याहस्ते योजनेस प्रारंभ होणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बीडच्या धर्तीवर अवघ्या पाच रुपयांत शेतकऱ्यांना जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्रदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते होत आहे. जिल्ह्यासह परराज्यातून मार्केट यार्डात येणाऱ्या दररोज पाचशेवर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पतंगराव कदम आहेत. यावेळी खासदार संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, प्रतीक पाटील, महापौर हारूण शिकलगार, जयश्रीताई मदन पाटील, विशाल पाटील, दिनकरतात्या पाटील, संभाजी पवार, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पणनचे कार्यकारी संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, सरव्यवस्थापक मिलिंद आकरे उपस्थित राहणार आहेत. सांगलीची हळद, गूळ आणि बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ आहे. मार्केट यार्डात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह परराज्यातील शेतकरी शेतीमालाच्या विक्रीसाठी येतात. दररोज किमान पाचशे शेतकरी मार्केट यार्डात येत असतात. याशिवाय हंगामात त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची संख्या असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची सांगलीत जेवणाची गैरसोय होत असते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अवघ्या पाच रुपयांत पोटभर जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती आणि अडते यांच्याकडून जेवणासाठी येणारा हा खर्च केला जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जेवणासाठी तीस रुपये खर्च येत असला तरी, त्यांच्याकडून अवघे पाच रुपयेच घेतले जाणार आहे. उर्वरित रक्कम सांगली बाजार समितीकडून खर्च केली जाईल. सध्या काही शेतकऱ्यांना व्यापारी जेवण देतात, मात्र अनेक शेतकऱ्यांचे जेवणासाठी हाल होत असल्याचेही दिसून आले आहे. शेतकऱ्यांना जेवण देण्याच्या निर्णयास सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाने सहमती दर्शविली. आता हा उपक्रम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)बीड बाजार समितीच्या धर्तीवर प्रयोगबीड कृषी बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना पाच रुपयांत जेवण दिले जाते. त्याच धर्तीवर सांगली बाजार समितीने धाडसी निर्णय घेतला आहे. जेवणामध्ये चपाती, भाजी, आमटी, भात असा मेनू राहणार आहे. बाहेरुन येणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवणाअभावी हाल होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.