शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांना आमदारकीची लॉटरी

By admin | Updated: October 22, 2014 00:26 IST

मनी मंत्रालयातील कित्येक सदस्य यापूर्वी विधानसभेत पोहोचले. त्यांचाच कित्ता तीन सदस्यांनी गिरवला आहे.

कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केलेले तीन सदस्य आता आमदार झाले आहेत. विद्यमान सदस्य अमल महाडिक भारतीय जनता पक्षाकडून, तर माजी सदस्य प्रकाश आबिटकर व सत्यजित पाटील-सरूडकर शिवसेनेतून आमदार झाले आहेत. ‘जिल्हा परिषद ते विधानसभा’ असा त्यांचा राजकीय आलेख उंचावला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह विविध सहकारी संस्था राजकारणातील कार्यशाळा म्हणून मानली जाते. राजकीय करिअर करू इच्छिणारे येथूनच निवडणुकीच्या फडात उडी टाकतात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघांतील वाड्या-वस्त्यांवर संपर्क वाढतो. राज्य आणि केंद्राच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यामुळे मतदारसंघातील जनतेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संपर्क येतो. क्रियाशील, प्रभावी काम करण्याची शैली असलेले सदस्य जिल्हा परिषद मतदारसंघासह तालुका, विधानसभा मतदारसंघ यामध्ये स्वत:ची ओळख अणि गट निर्माण करतात. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. प्रसंगी ज्यांचे बोट धरून राजकारणात चंचुप्रवेश करतात अशा आपल्या गुरूंच्या विरोधात नंतर शड्डू ठोकतात. गुरूंना हरवून आमदार होतात, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आजवरचा इतिहास आहे. जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव जाधव, उदयसिंहराव गायकवाड यांनी आमदार व खासदारकीपर्यंत मजल मारली. बाळासाहेब माने जिल्हा परिषद अध्यक्ष होत. पुढे तेही खासदार झाले होते. सदाशिव मंडलिक, नरसिंगराव पाटील, भरमू पाटील, बाबा कुपेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यातील भरमू पाटील यांनी मंत्री म्हणून, तर कुपेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले. हसन मुश्रीफ यांनी पंचायत समिती सभापती म्हणून काम केले आहे. सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. ते आता चौथ्यांदा आमदार झाले आहेत. खासदार राजू शेट्टी हेही जिल्हा परिषदेचे सदस्य होते. सदस्यपदाचा कार्यकाल संपण्यापूर्वीच शेट्टी आमदार झाले. आमदारकीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच खासदार झाले. या विधानसभा निवडणुकीत विद्यमान सदस्य अमल महाडिक, माजी सदस्य आबिटकर, पाटील-सरूडकर आमदार झाले आहेत. (प्रतिनिधी)मनी मंत्रालयातील कित्येक सदस्य यापूर्वी विधानसभेत पोहोचले. त्यांचाच कित्ता तीन सदस्यांनी गिरवला आहे.एका सदस्याचा पराभव...गडहिंग्लज तालुक्यातील अप्पी पाटील जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहातून विधानसभेत जाण्याची त्यांची संधी हुकली.