शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

शहरातील तीन प्रमुख रस्ते बंद, वाहतूक अन्य मार्गाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST

कोल्हापूर : केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी शहरातील तीन प्रमुख रस्ते पुढील ४५ दिवस ...

कोल्हापूर : केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी शहरातील तीन प्रमुख रस्ते पुढील ४५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शहरातील नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हे काम आज, बुधवारपासून (दि. १६) सुरू करण्यात येत आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम पुढील ४५ दिवस सुरू रहाणार आहे. रस्त्यावर टाकाव्या लागणाऱ्या जलवाहिनीचा व्यास मोठा असल्याने कामासाठी रस्ता पूर्णत: बंद करणे आवश्यक आहे.

या कामाच्या ठिकाणच्या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक बंद राहणार आहे. शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तीनही रस्ते शहरातील प्रमुख रस्ते असून, आयआरबी कंपनीने केलेले आहेत. अत्यंत सुस्थितीतील रस्ते जेसीबीच्या सहाय्याने उकरण्यात येत आहेत. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होताच रस्ते दुरुस्तीचे कामही तातडीने हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. अमृत योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी शहरात तसेच उपनगरांत अशा पद्धतीने जलवाहिनी टाकल्या; परंतु त्याठिकाणी रस्ते केले नाहीत, अशा तक्रारी खुद्द नगरसेवकांनी केल्या होत्या. म्हणूनच प्रमुख रस्ते खुदाई झाल्यानंतर ते तत्काळ दुरुस्त करावेत, या कामाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

हे रस्ते होतील बंद

१. जिल्हाधिकारी कार्यालय ते शासकीय विश्रामगृह

२. सायबर चौक ते लकी बझार

३. कसबा बावडा जलशुद्धिकरण केंद्र ते गोळीबार मैदान