शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुधाची तीन हजार कोटींची उलाढाल

By admin | Updated: June 1, 2016 00:55 IST

प्रमुख बाजारपेठेवर पकड : सात लाख शेतकऱ्यांना हक्काचा आधार--जागतिक दूध दिन

राजाराम लोंढे -- कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये साखर उद्योगाच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका दुग्ध व्यवसायाने बजावली आहे. सात लाखांपेक्षा अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाने आधार दिला असून, केवळ दुधाची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी आहे. येथील दूध संघांनी गुणवत्तेच्या बळावर मुंबईसह प्रमुख बाजारपेठांवर चांगलीच पकड मिळवली आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून २० हून अधिक साखर कारखान्यांचे जाळे पसरल्याने येथे ऊस उत्पादन हाच शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय ठरला. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय पुढे आला; पण निसर्गाचा लहरीपणा व ऊसदराची अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दूध व्यवसायाने खऱ्या अर्थाने दिलासा दिला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने दर दहा दिवसाला दुधाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केल्याने आपोआपच या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला. ‘गोकुळ’, ‘वारणा’ पाठोपाठ ‘मयूर’, ‘महालक्ष्मी’,‘समृद्धी’ दूध संघाने या व्यवसायात उडी घेतली. प्रशासनातील चुकीच्या निर्णयाने ‘मयूर’,‘समृद्धी’ व ‘महालक्ष्मी’ अडचणीत आल्याने येथील दूध व्यवसायावर परिणाम होईल असे वाटत होते; पण ‘गोकुळ’ व ‘वारणा’च्या माध्यमातून येथील उत्पादक पुन्हा ताकदीने उभा राहिला. त्याला ‘शाहू’ व ‘स्वाभिमानी’ या दोन संघांनी चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यात सध्या २५ लाख लिटर दुधाचे उत्पादन आहे. त्यापैकी जवळपास दहा लाख लिटर घरगुती वापराबरोबर उपपदार्थांसाठी वापरले जाते तर १५ लाख लिटरची विक्री होते. सात लाख दूध उत्पादक या संघांशी संलग्न आहेत. मुंबईसह राष्ट्रीय पातळीवरील दुधाची विशेष करून म्हैस दुधाची वाढलेली मागणी पाहता सर्वच संघांनी दूध वाढीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोल्हापूरच्या दुधाने आपल्या गुणवत्ता व दर्जेदार पणाच्या जोरावर मुंबई, गोवा, पुणे, नाशिक आदी प्रमुख बाजारपेठा काबीज केल्या आहेत. दूध दरातही कोल्हापूर आघाडीवरयेथे दर दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या हातात पैसे देण्याची व्यवस्था दूध संघांनी केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तुलनेत कोल्हापुरातील दुधाचे दर जास्त असल्याने येथे दूध व्यवसायाला बळकटी मिळाली आहे. चवदारपणामुळेच ‘भुरळ’!कोल्हापूरचा गूळ असो अथवा दूध, त्याला कमालीचा गोडवा आहे. मुळात येथील माती व पाणीच कसदार आहे. त्याचा परिणाम येथील शेती उत्पादनात दिसून येत असून, कोल्हापुरी दूध व उपपदार्थांतील कणदार व चवदारपणाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. महाराष्ट्रात रोज दोन कोटी २० लाख लिटर दूध संकलन होते. त्यापैकी १० टक्के म्हणजे २५ लाख लिटर संकलन एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात होते. दूध उत्पादनवाढीला येथील भौगोलिक परिस्थितीबरोबर संघटन कारणीभूत आहे. - डी. व्ही. घाणेकर, (कार्यकारी संचालक, गोकुळ)