शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

साडेतीन कोटींच्या रस्त्यात हजारो खड्ड

By admin | Updated: November 11, 2014 00:12 IST

रस्त्याची दुरवस्था : पाटपन्हाळा-वाशी मार्गे

बाजार भोगाव : खर्च कोटींत आणि खड्डे हजारात अशी दयनीय अवस्था पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा-वाशी रस्त्याची झाली आहे. त्यामुळे प्रवासीवर्गांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘खड्डेमय’ रस्त्याला कोण वाली आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांतून होत आहे.पाटपन्हाळा-वाशी हा रस्ता जांभळी खोऱ्यातील प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर मुगडेवाडी, सुंबेवाडी, सोनारवाडी, सावतवाडी, पिसात्री, गुरववाडी, खापणेवाडी, आढाववाडी, सपकाळवाडी आदी वस्त्या आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सुमारे साडेतीन कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला, पण रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काम झाल्यानंतर अवघ्या चार-पाच महिन्यांतच ठिकठिकाणी डांबरीकरण उखडून खड्डे पडू लागले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. याकडे यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने लोकांच्या सोयीचा रस्ता डोकेदुखी बनला आहे.दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही शेतकऱ्यांनी कुंपणे घातल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने समोरासमोर आल्यावर मोठी गैरसोय होते.रस्त्याच्या मोरींची उंची वाढविली असल्याने चारचाकी गाड्यांना अनेक अडचणी येतात. शिवाय पावसाळ्यात पाणी येत असल्याने रस्ता बंद होण्याचा कालावधी जास्त होता. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होते. परिणामी मोरीची उंची वाढवावी, अशी मागणी ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील यांनी केली. आमदार चंद्रदीप नरके यांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.