शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

प्रेमाच्या बंधनापुढे शब्दही थिटे..!

By admin | Updated: February 13, 2015 23:59 IST

मूकबधिर दाम्पत्य : प्रेमविवाह करून दिली साथ

विश्वास पाटील -कोल्हापूरपहिलीपासून दहावीपर्यंत दोघेही वि. म. लोहिया मूकबधिर शाळेचे विद्यार्थी... शाळेत असतानाही त्यांना एकमेकांबद्दल कमालीची ओढ. त्यामुळे त्यांनी ठरविले आणि आयुष्यभराचे साथीदार झाले. त्यांच्या लग्नाला अकरा वर्षे झाली, अगदी आनंदात त्यांचा संसार सुरू आहे. दोघेही मूकबधिर. एकमेकांशी हाताने खाणाखुणा करूनच त्यांचा संवाद होतो. पण त्यांचे परस्परांवरील प्रेमाचे बंधन इतके घट्ट आहे की तिथे शब्दही थिटे पडावेत. गौरी आणि अतुल सूर्यकांत भाळवणे असे या दांपत्याचे नाव.अतुलचे कुटुंबीय शाहूपुरीच्या चौथी गल्लीत राहणारे; तर गौरी भाळवणे लग्नापूर्वीची गौरी चोडणकर. रेल्वे फाटकाजवळ राहणारी. दोघांचीही कौटुंबिक स्थिती जेमतेमच. दोघेही भिन्न जातींतील; परंतु त्यांच्या लग्नात यातील काहीच आड आले नाही. दहावीपर्यंत ते शिकले. अतुलने धडपड करून नोकरी मिळविली. सध्या तो कंत्राटी शिपाई म्हणून काम करतो. गौरी घरीच असते; परंतु ती नुसते घरकाम करून बसणारी मुलगी नाही. कुटुंबाला चार पैशांचा आधार व्हावा म्हणून तिने साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही मूकबधिर; परंतु तरीही ते सुरतला जातात व एकदम साड्या खरेदी करतात. ती ओळखीच्या महिलांना घरोघरी जाऊन साड्या विकते. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा ओम दुसरीत तर मुलगी सिद्धी पाचवीत शिकते. निसर्गाचा न्याय बघा. दोन्ही मुले सर्वसामान्य आहेत. म्हणजे बडबडी. त्याचाही आनंद या दाम्पत्यास आहे.सगळी सुखे व श्रीमंती पायांशी लोळत असूनही किरकोळ कारणांसाठी मानसिक त्रास करून घेणारी व छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आत्महत्येच्या मार्गाने जाणारी कुटुंबे पाहिली की अतुल-गौरी यांच्या जगण्याचे मोठेपण लक्षात येते. दोघांनाही एकही शब्द बोलता येत नाही. जे काही असेल ते एकमेकांना हातवारे करूनच ते सांगतात; परंतु म्हणून त्या वाचून त्यांचे काहीच अडलेले नाही. अतुल चांगला मुलगा आहे, त्याची कामात चांगली प्रगती आहे; म्हणून मी त्याच्याशी लग्न केले, असे गौरीने सांगितले. तो तुझ्याबरोबर भांडतो का? असे विचारल्यावर तिला जाम हसू आले... बोटाने हावभाव करीत तिने थोडा... थोडा भांडतो, असे सांगितले.हे दोघेही कोल्हापूर जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे कार्यकर्ते आहेत. कोल्हापुरातील पन्नासहून अधिक मूकबधिर मुले-मुली आठवड्यातून एक दिवस एकत्र जमतात. एकमेकांच्या अडीअडचणी सोडवितात. पती-पत्नीतील एक मूकबधिर व दुसरा सामान्य असल्यास विवाह जास्त दिवस टिकत नाही. उलट दोघेही मूकबधिर असल्यास एकमेकांना जास्त चांगले समजून घेतात, असे निरीक्षण असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर यांनी नोंदविले.