शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

प्रेमाच्या बंधनापुढे शब्दही थिटे..!

By admin | Updated: February 13, 2015 23:59 IST

मूकबधिर दाम्पत्य : प्रेमविवाह करून दिली साथ

विश्वास पाटील -कोल्हापूरपहिलीपासून दहावीपर्यंत दोघेही वि. म. लोहिया मूकबधिर शाळेचे विद्यार्थी... शाळेत असतानाही त्यांना एकमेकांबद्दल कमालीची ओढ. त्यामुळे त्यांनी ठरविले आणि आयुष्यभराचे साथीदार झाले. त्यांच्या लग्नाला अकरा वर्षे झाली, अगदी आनंदात त्यांचा संसार सुरू आहे. दोघेही मूकबधिर. एकमेकांशी हाताने खाणाखुणा करूनच त्यांचा संवाद होतो. पण त्यांचे परस्परांवरील प्रेमाचे बंधन इतके घट्ट आहे की तिथे शब्दही थिटे पडावेत. गौरी आणि अतुल सूर्यकांत भाळवणे असे या दांपत्याचे नाव.अतुलचे कुटुंबीय शाहूपुरीच्या चौथी गल्लीत राहणारे; तर गौरी भाळवणे लग्नापूर्वीची गौरी चोडणकर. रेल्वे फाटकाजवळ राहणारी. दोघांचीही कौटुंबिक स्थिती जेमतेमच. दोघेही भिन्न जातींतील; परंतु त्यांच्या लग्नात यातील काहीच आड आले नाही. दहावीपर्यंत ते शिकले. अतुलने धडपड करून नोकरी मिळविली. सध्या तो कंत्राटी शिपाई म्हणून काम करतो. गौरी घरीच असते; परंतु ती नुसते घरकाम करून बसणारी मुलगी नाही. कुटुंबाला चार पैशांचा आधार व्हावा म्हणून तिने साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही मूकबधिर; परंतु तरीही ते सुरतला जातात व एकदम साड्या खरेदी करतात. ती ओळखीच्या महिलांना घरोघरी जाऊन साड्या विकते. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा ओम दुसरीत तर मुलगी सिद्धी पाचवीत शिकते. निसर्गाचा न्याय बघा. दोन्ही मुले सर्वसामान्य आहेत. म्हणजे बडबडी. त्याचाही आनंद या दाम्पत्यास आहे.सगळी सुखे व श्रीमंती पायांशी लोळत असूनही किरकोळ कारणांसाठी मानसिक त्रास करून घेणारी व छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आत्महत्येच्या मार्गाने जाणारी कुटुंबे पाहिली की अतुल-गौरी यांच्या जगण्याचे मोठेपण लक्षात येते. दोघांनाही एकही शब्द बोलता येत नाही. जे काही असेल ते एकमेकांना हातवारे करूनच ते सांगतात; परंतु म्हणून त्या वाचून त्यांचे काहीच अडलेले नाही. अतुल चांगला मुलगा आहे, त्याची कामात चांगली प्रगती आहे; म्हणून मी त्याच्याशी लग्न केले, असे गौरीने सांगितले. तो तुझ्याबरोबर भांडतो का? असे विचारल्यावर तिला जाम हसू आले... बोटाने हावभाव करीत तिने थोडा... थोडा भांडतो, असे सांगितले.हे दोघेही कोल्हापूर जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे कार्यकर्ते आहेत. कोल्हापुरातील पन्नासहून अधिक मूकबधिर मुले-मुली आठवड्यातून एक दिवस एकत्र जमतात. एकमेकांच्या अडीअडचणी सोडवितात. पती-पत्नीतील एक मूकबधिर व दुसरा सामान्य असल्यास विवाह जास्त दिवस टिकत नाही. उलट दोघेही मूकबधिर असल्यास एकमेकांना जास्त चांगले समजून घेतात, असे निरीक्षण असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर यांनी नोंदविले.