शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

तीस वर्षांनंतर ‘गोकुळ’वर तालुक्यातून दोन संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

गेल्या तीस वर्षांचा गोकुळ संचालकपदाचा तालुक्याचा वनवास संपला असून, दोन्ही पॅनेलमधून तालुक्यात दोन संचालक प्रथमच गोकुळमध्ये पोहोचले आहेत. तालुक्याच्या ...

गेल्या तीस वर्षांचा गोकुळ संचालकपदाचा तालुक्याचा वनवास संपला असून, दोन्ही पॅनेलमधून तालुक्यात दोन संचालक प्रथमच गोकुळमध्ये पोहोचले आहेत. तालुक्याच्या विकासाला यामुळे चालना मिळणार असली तरी वर्षभरात होणाऱ्या सहकारी संस्था, राजाराम कारखाना, वडगाव मार्केट कमेटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकामध्ये नवी राजकीय समीकरणे जुळणार की पारंपरिक विरोधक आमने-सामने येणार हे काळच ठरविणार आहे.

हातकणंगले तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे रणांगण राजकीय उलथापालथीने गाजले. तीन मंत्री, एक खासदार, चार आमदार, माजी आमदार असलेल्या महाविकास आघाडीच्या शाहू शेतकरी आघाडीकडून मागासवर्ग गटातून माजी आ. सुजित मिणचेकर यांना लॉटरी लागली. काँग्रेस (आय) पक्षाचे आ. राजूबाबा आवळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिणचेकरांंचा हिरिरीने प्रचार केला. विधानसभेला एकमेकांचे विरोधक असताना गोकुळमध्ये एकत्र येऊन महाविकास आघाडी धर्म पाळला.

सत्ताधारी आ. पी. एन. पाटील, माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या आघाडीतर्फे प्रथमच महाडिक घरातील उमेदवारी होती. महाडिक मुक्त गोकुळ अशी विरोधी गटाची प्रचार यंत्रणा होती. मात्र, मतदारांनी शौमिका महाडिक यांना गोकुळवर पाठवून महाडिक गटाची तालुक्याच्या राजकारणावर पकड असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

गोकुळवर तालुक्यातून प्रथमच सत्ताधारी आणि विरोधी असे दोन संचालक निवडून गेल्याने तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. दुग्ध उत्पादनात तालुका आघाडीवर असूनही वारणा, स्वाभिमानी संघाकडे होणाऱ्या दूध पुरवठ्यामुळे गोकुळकडे तुलनेने कमी दूध संस्था आहेत. दोन संचालकांच्या पाठबळावर गोकुळचा दूध पुरवठा वाढेल याची खात्री वाढली आहे.

गोकुळच्या रणागणांमुळे तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे.

पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष एकत्र आले आहेत, तर महाडिक गटाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपचा घरोबा निर्माण झाल्यामुळे वर्षभरामध्ये होणाऱ्या विविध सहकारी संस्था, राजाराम कारखाना, वडगाव मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये नवी राजकीय समीकरणे जुळणार की पारंपरिक विरोधकांमध्ये सामना होणार हे काळच ठरविणार आहे.