शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘एलबीटी’ची नियमबाह्य वसुली नको

By admin | Updated: July 30, 2014 00:31 IST

न्यायालयाचा आदेश : महापालिकेकडून विनाकारण त्रास; व्यापारीमित्र संघटनेची माहिती

कोल्हापूर : शहरातील व्यापाऱ्यांवर स्थानिक व्यापारी कर कायद्यातील तरतुदींच्या बाहेर जावून कोणतीही कारवाई करण्यास, कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच न्यायालयाने यापूर्वीच दिलेला आदेश यापुढेही अंतिम निकालापर्यंत लागू राहणार असल्याची माहिती व्यापारीमित्र संघटनेचे अ‍ॅड. अरविंद मेहता आणि व्यापारी प्रदीपभाई कापडिया यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.मेहता म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे एलबीटी वसुलीसाठी कारवाई सुरु होती. याबाबत व्यापाऱ्यांच्यावतीने कोल्हापुरातील दिवाणी न्यायालयात २४ मार्च २०१४ ला दावा दाखल करण्यात आला. त्यावर २८ मार्च रोजी न्यायालयाचा आदेश झाला. यात व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्यास महापालिकेने पुढील तारखेपर्यंत वादी ॅकिंवा शहरातील व्यापाऱ्यांच्या विरोधात स्थानिक व्यापारी कर कायद्यातील एलबीटी तरतुदींच्या बाहेर जावून कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश महापालिकेला दिला. असे असतानाही जुलैमध्ये महापालिकेने शहरातील सुमारे १५०० व्यापारी, उद्योजकांना त्यांचे बँक खाते सील करण्याबाबत तसेच अन्य स्वरूपातील नोटिसा पाठविल्या. त्यानंतर व्यापारी मित्र संघटनेने ९ जुलै रोजी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर १४, १७ आणि १९ जुलै रोजी या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून सुनावणीस बोलविले होते. या नोटीसप्रमाणे व्यापाऱ्यांच्या बाजूने न्यायालयात म्हणणे मांडण्यात आले. याबाबत न्यायालयाने यापूर्वीच दिलेला आदेश यापुढेही अंतिम निकालापर्यंत लागू राहील, असा आदेश दिला.कापडिया म्हणाले, महापालिका व्यापारी, उद्योजकांना वारंवार बेकायदेशीररित्या नोटिसा, एसएमएस आणि प्रत्यक्ष दुकानात जावून त्रास देणे सुरू केले. त्याबाबत व्यापारी मित्र संघटनेच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजकांनी कायदेशीररित्या लढाई करण्याचे ठरविले. त्याची आता सुरुवात आहे. एलबीटी आम्ही देत आहोत. मात्र, महापालिकेकडून जी बेकायदेशीर वसुली सुरू आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा दिला.पत्रकार परिषदेस कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र तेंडुलकर, अजित कोठारी, विजय मंत्री, वैभव सावर्डेकर, श्रीनिवास मिठारी, संजय शेटे, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे एलबीटी वसुलीसाठी कारवाई व्यापाऱ्यांच्यावतीने कोल्हापुरातील दिवाणी न्यायालयात दावा दाखल न्यायालयाचा एलबीटी तरतुदींच्या बाहेर जावून कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश असे असतानाही महापालिकेच्या शहरातील सुमारे १५०० व्यापाऱ्यांना नोटीसा