शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यातील अपेक्षित गाळ उठाव नाही

By admin | Updated: May 20, 2016 00:30 IST

नियोजनाचा अभाव : सुशोभीकरणाची गतीही संथ; पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आव्हान

अमर पाटील -कळंबा --अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. कळंबा तलावातील गाळाच्या उठावाचा मंदावलेला वेग विचारात घेतला तर पावसाळ्यापूर्वी तलाव पूर्णपणे गाळमुक्त होणे अशक्यप्राय आहे. गाळ उपशात नियोजनाचा अभाव, तोकडी यंत्रणा यामुळे तलावात बराचसा गाळ शिल्लक राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे सुशोभीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने फक्त संरक्षक भिंतीची काही कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे सांडवा दुरुस्ती, बंधारा मजबुतीकरण व दुरुस्ती, मनोरा दुरुस्ती, जनावरे धुण्याचा हौद, सौरऊर्जा दिवे ही पावसाळ्यापूर्वी करायची तलावासंबंधीची महत्त्वाची कामे अपूर्णच राहिली आहेत. त्यामुळे कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे नियोजनाअभावी तीन तेरा झाले आहेत. डिसेंबर महिन्यात तलावात मृत पाणीसाठा चार फूट होता. बाकी कोरडा गाळ शिल्लक होता. तलावाविषयी असणाऱ्या आस्थेने लोकसहभागातून गाळ उठाव मोहिमचा प्रारंभ त्याचवेळी करणे गरजेचे होते. परंतु, प्रत्यक्षात गाळ उपसा मोहिमेस प्रारंभ व्हायला १५ मार्च उजाडला. दोन कोटींच्या विशेष निधीसह जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंपदा यांत्रिकी विभागाने सुरुवातीस १ एक्साविटर व १ डोझर उपलब्ध करून दिला. ज्यामुळे गाळ उपसा वाढला; पण गाळ भरून नेण्यासाठी ट्रॅक्टर, डंपरची सोय पालिका, ग्रामपंचायतींसह कोणत्याच प्रशासनाने न केल्याने गाळ उठावात शिथिलता आली आहे. आजअखेर जरी ४५ हजारांवर डंपर, ट्रॉली गाळ काढण्यात आला असला तरी तेवढाच गाळ काढण्याचे काम शिल्लक आहे. आतापर्यंत केलेल्या गाळ उपशातून पाणीपातळी दहा फुटांनी वाढणार असल्याने दोन दशलक्ष घनफूट पाणीसाठा यंदा वाढेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. तरीही अजून गाळ उपसा करणे गरजेचे आहे. जैव प्राधिकरण समिती, निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी तलावास भेट देऊन तलावाच्या बंधाऱ्यापासून दीडशे फूट अंतर राखून एकसारखा सलग गाळ उपसा करण्याच्या सूचना केल्या होत्या. पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांना बाधा येऊ न देण्याविषयीही सांगितले होते, पण गाळ उपशावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कोणीही कसाही गाळ उपसा केला आहे. त्यामुळे मनोऱ्यालगत पूर्वेस अर्ध्या तलावात गाळ अजून तसाच शिल्लक आहे. लोकसहभागातून तसेच कळंबा तलावाशी संबंधित सर्वच प्रशासनाने ट्रॅक्टर, डंपरची सुविधा उपलब्ध करून दिल्यास दोन शिफ्टमध्ये काम करण्याचीही जलसंपदा विभागाची तयारी आहे. एक एक्साविटर, व्हील लोडर, तीन डोझर, दहा जेसीबी मशिन्स, खासगी जेसीबी यांच्या साहाय्याने गाळ उपसा होतो. मात्र, उठावाची यंत्रणाच तोकडी असल्याने पावसाळ्यापूर्वी तलाव गाळमुक्त करण्याच्या मोहिमेस खो बसत आहे. सुशोभीकरण काम सुरूचनिविदाधारक कंपनीनेही नोव्हेंबर महिन्यात काम सुरू केले. मात्र, त्या कंपनीने सायकल ट्रॅक, योगा केंद्र, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार ही कामे करण्यात धन्यता मानली. वास्तविक पावसाळ्यापूर्वी तलावाभोवती वनसंपदा निर्माण करण्यासाठी खड्डे काढणे, विविध वृक्षांच्या वनौषधी प्रजातींची उपलब्धता करणे, सांडव्याची दुरुस्ती करणे, सौरऊर्जा दिवे उभारणे, ढासळलेला मनोरा दुरुस्ती, बंधारा मजबुतीकरण, जनावरांचा धुण्याचा हौद, गणेश विसर्जन कुंड उभारणी ही कामे महत्त्वाची होती. कळंबा तलाव कोरडा पडल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. परंतु या कामात नियोजनाचा अभाव असल्याने मनोऱ्यालगत पूर्वेस अर्ध्या तलावात गाळ तसाच शिल्लक आहे.