शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

हस्तांतरण होऊनही लेखापरीक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:31 IST

अक्षय पोवार लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊनही ती योजना समितीने ...

अक्षय पोवार

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊनही ती योजना समितीने ग्रामपंचायतीकडे वर्ग केली नाही. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात योजना हस्तांतरित करून घेण्यात आली. त्याला वर्ष उलटले तरी अद्याप लेखापरीक्षण नाहीच.

योजना पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिले असतानाही शासनाचा आदेश डावलून उद्घाटन न करताच समितीने योजना आपल्याकडे ठेवून काम सुरू केले. उद्घाटन झाल्यास हस्तांतरण होईल म्हणून समितीने हा फंडा वापरला. योजनेसाठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, महिला सक्षमीकरण समिती व सामाजिक लेखापरीक्षण समिती या तीन समित्या गठीत करण्यात आल्या. योजना एप्रिल २०११ च्या दरम्यान पूर्ण झाली. दहा वर्षे समितीने ही योजना हाताळली; परंतु अजूनही गावातील वाढीव भागात पिण्याचे पाणी पोहोचले नाही. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे मागणी केली; परंतु योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग नसल्याने निधी मिळत नाही, असे ग्रामपंचायतीमार्फत सांगण्यात आले.

जलस्वराज्य योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग नसल्याने ग्रामनिधी मिळण्यास अडचणी येत आहेत, म्हणून १६ जानेवारी २०२० रोजी हा प्रकल्प ७ विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्या मदतीने समितीकडून पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने ताब्यात घेतला. त्याला एक वर्ष उलटून गेले तरीही त्याचे लेखापरीक्षण अजूनही झाले नाही. त्यामुळे या प्रकल्पामागे काय गौडबंगाल आहे का, अशी उलटसुलट चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. (उत्तरार्ध)

चौकट

'ते' २३ कर्मचारी अधिकृत सेवेत नाहीत

योजना सुरू करताना २३ कर्मचारी घेण्यात आले. ही योजना सुरुवातीला समितीने हाताळली. त्यानंतर ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली. त्यावेळी गावसभेत या २३ कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीकडे ठेवावे, असा ठराव करण्यात आला. मात्र, अजूनही या २३ कर्मचाऱ्यांना अधिकृत सेवेत समाविष्ट केले नाही.