शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एक इंच पावसाच्या पाण्यावर जगविली दोन हजार झाडे

By admin | Updated: May 21, 2016 00:11 IST

हातकणंगलेत फुलवली आमराई : बाळासाहेब कारदगे यांचा ५० एकर शेतीतील उपक्रम; पर्जन्य जलसंचय -जलमित्र

संतोष मिठारी--कोल्हापूर --पावसाच्या पूर्ण हंगामात कसाबसा एक ते सव्वा इंच पाऊस होणाऱ्या हातकणंगले तालुक्यात कोल्हापुरातील शेतकरी बाळासाहेब कारदगे यांनी ५० एकरांतील आंब्याची दोन हजार झाडे जगविली आहेत. यासाठी त्यांनी पर्जन्य जलसंचयाद्वारे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) स्वयंपूर्णता साधली आहे.मौजे तासगाव-हेर्ले सीमेवर ५० एकर कोरडवाहू जमिनीवर गेल्या पाच वर्षांपूर्वी आंब्याची दोन हजार झाडे लावली. त्यांना पाणी देण्यासाठी त्यांनी या परिसरात तीन कूपनलिका आणि विहीर खोदली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना पाणीटंचाई जाणवत होती. अशा स्थितीत झाडे जगविण्यासाठी त्यांच्या मुळावर ज्यूटच्या पोत्यांचे आवरण घालणे असे प्रयत्न त्यांनी केले. पण, पाण्यासाठी ठोस पर्याय असावा या उद्देशाने त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याचे ठरविले. यानुसार त्यांनी त्यांच्या जमिनीच्या परिसरात असलेल्या कूपनलिका आणि कृषी विभागाने बांधलेला बंधारा या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण केले. त्याचा चांगला परिणाम झाला. गेल्या वर्षी कमी पाऊस होऊनदेखील कारदगे यांची विहीर, कूपनलिकांना सध्या पुरेसे पाणी असून त्याद्वारे त्यांनी आपली आंब्याची दोन हजार झाडे जगविली आहेत. कारदगे यांचा दुष्काळी भागातील पाण्याच्या स्वयंपूर्णतेचा उपक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.पुनर्भरण केले असेकृषी खात्याने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’अंतर्गत जे बंधारे बांधले होते, त्यांचे कारदगे यांनी निरीक्षण केले. त्यांचा जलसंचयासाठी फारसा उपयोग होत नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यावर कारदगे यांनी त्यांच्या जमिनीच्या परिसरात असलेला एक बंधारा पूर्णपणे मोडून टाकला. शिवाय सिंचन विभागातील अभियंत्याच्या सल्ल्याने धरणाच्या भिंतीचा पाया खडकापर्यंत काढून त्यात पूर्ण काळी माती भरून त्यावर मुरुम व दगडाचे आवरण घातले. तसेच सांडवा तळापासून दहा फूट उंच केला. बाजूला ३५ इंचांची व ३५ फूट व्यासाची विहीर खोदली. या ठिकाणी किरकोळ पाऊस झाला तरी, त्याचे पाणी बंधाऱ्यात मुरून ते विहिरीत साठते. पर्जन्य जलसंचयाचा हा उपक्रम त्यांनी कूपनलिकेसाठी केला. त्यांनी कूपनलिकेच्या उताराच्या बाजूला लांबपर्यंत चर मारली. त्यात प्लास्टिकचा कागद घालून खडी भरली. त्याला आउटलेट करून ते कूपनलिकेच्या बाजूला जोडले. याआधी कूपनलिकेच्या बाजूला वॉटर हार्वेस्टिंगसाठी एक चर खोदून त्यात खाली दगड, मोठी व बारीक खडी, त्याच्यावर वाळूचा थर आणि कूपनलिकेच्या केसिंग पाईपला दहा एमएमचे छिद्र मारून त्यावर काथ्या गुंडाळला.शहरांमध्ये पाण्याचा अधिक प्रमाणात अपव्यय होत आहे. शिवाय ग्रामीण भागात पाटाद्वारे पाणी देण्याच्या पद्धतीत पाणी वाया जाते. हे टाळणे आवश्यक आहे. शेतीसाठी ठिंबक सिंचनचा वापर करण्यात यावा. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल. ‘पाणी अडवा - पाणी जिरवा,’ रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पाणीवापराबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘जलमित्र अभियान’चा उपक्रम स्तुत्य आहे. - डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर.रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे अशा पद्धतीने कोणत्याही विहिरीचे पुनर्भरण करता येते. त्या विहिरीत जमिनीवरचे पाणी वळवून आणणे शक्य आहे. असा स्वरूपाचा प्रयोग मी पाच ते सहा ठिकाणी केला असून यात यश मिळाले आहे. ज्या कूपनलिकेला अजिबात पाणी नव्हते, ती चार तास चालत आहे. तसेच जी विहीर पावसाळ्यानंतर कोरडी पडत होती, त्यात जानेवारीअखेरपर्यंत पाणी उपलब्ध होत आहे.- बाळासाहेब कारदगे, शेतकरी, कोल्हापूर.