शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या हद्दवाढीला आता दोनच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:17 IST

काेल्हापूर : लोकप्रतिनिधींनी समजूतदारपणा दाखविला आणि सरकारने लोकांना विश्वासात घेऊन त्यांना फायदे -तोटे पटवून दिले, तर कोल्हापूर शहराची गेल्या ...

काेल्हापूर : लोकप्रतिनिधींनी समजूतदारपणा दाखविला आणि सरकारने लोकांना विश्वासात घेऊन त्यांना फायदे -तोटे पटवून दिले, तर कोल्हापूर शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली हद्दवाढीची मागणी मान्य होऊ शकेल. कधी ना कधी या प्रश्नाची कोंडी फुटलीच पाहिजे, या न्यायाने शेवटचा पर्याय म्हणून राज्य सकारने जर आपले अधिकार वापरण्याचे ठरविले तरीही शहराची हद्दवाढ होऊ शकते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, शहराच्या हद्दवाढीच्या मागणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. तसेच त्यांनी दिलेल्या ग्वाहीमुळे हद्दवाढ होईल, या कोल्हापूरकरांच्या अपेक्षांनाही बळ मिळाले. मागच्या सरकारमधील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीच्या मागणीला बगल देऊन कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण लादले होते, या प्राधिकरणामुळे ग्रामिण तसेच शहरी जनतेला काय फायदा झाला, विकास किती झाला, याचीही चर्चा आता नव्याने होईल.

सरकारच्या पैशावर ग्रामीण भागाचा विकास अवलंबून असल्याने महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शहरालगतची गावे किती सुधारली आणि १९७२ मध्ये नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर गेल्या ४८ वर्षांत शहराचा किती विकास झाला, याचा तौलनिक अभ्यासही व्हायला लागेल. सध्याचे चित्र पाहता, ग्रामीण भागात अद्याप पुरेशा नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळेच भौगोलिक सलगता असलेल्या ग्रामपंचायतींनी महापालिका हद्दीत समावेश करून घेणेच हिताचे ठरणार आहे.

-पुण्यात ग्रामपंचायतींचा आग्रह-

पुणे शहराची हद्दवाढ एकदम झाली नाही. १९९८ पासून आतापर्यंत पाचवेळा हद्दवाढ झाली. विशेष म्हणजे महापालिका हद्दीत गेल्यानंतर जमिनीला आलेली किंमत, मिळणाऱ्या नागरी सुविधा, विकास कामांना मिळणारा निधी याचा विचार करून तेथील ग्रामपंचायतींनी तसेच गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनीच महापालिकेत समाविष्ट होण्याचा आग्रह धरला होता. त्याचा अभ्यास कोल्हापुरातील ग्रामीण जनतेने केला पाहिजे.

- पहिल्या पाचमधील महापालिका २७ व्या स्थानी-

मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर नंतर स्थापन झालेली कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील पाचवी महानगरपालिका होती. पण शहराची हद्दवाढ सातत्याने डावलल्यामुळे ती आता राज्यातील महापालिकांच्या यादीत २७ व्या स्थानावर पोहोचली आहे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहर विस्तारले नाही. आडव्या विकासाऐवजी उभा विकास होत असून, त्यालाही आता मर्यादा आलेल्या आहेत.

- राज्य सरकारला अधिकार -

शहराची हद्दवाढ करण्याचा अधिकार सरकारला आहे. पुण्यात गेल्या महिन्यात जी हद्दवाढ झाली, ती अशीच झाली होती. तो अंतिम पर्याय राहील. परंतु एखाद्या प्रश्नाची सोडवणूक सर्वसंमतीने व चर्चेतून झालेली केव्हाही चांगलीच असेल. म्हणूनच सरकारनेही आता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

- चर्चेला तोंड फुटले, आता मोट बांधवी-

शहराच्या हद्दवाढीच्या मागणीस नव्याने तोंड फुटले आहे, त्यामुळे आता कोल्हापूरच्या पालकमंत्री यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर लोकांची मोट बांधावी. हद्दवाढीचे फायदे -तोटे लोकांना समजावून सांगावे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहराचे तसेच ग्रामीण भाग शहरात न आल्यामुळे काय नुकसान झाले, ते लोकांसमोर मांडावे. हद्दवाढ झाली, तर नुकसान कोणाचेही होणार नाही, उलट फायदाच होईल. या प्रश्नाची कोंडी फुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांना विश्वासात घ्यावे.

एस. एम. फडतरे,

सेवानिवृत्त नगररचना उपसंचालक

पुणे विभाग.