शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या हद्दवाढीला आता दोनच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:17 IST

काेल्हापूर : लोकप्रतिनिधींनी समजूतदारपणा दाखविला आणि सरकारने लोकांना विश्वासात घेऊन त्यांना फायदे -तोटे पटवून दिले, तर कोल्हापूर शहराची गेल्या ...

काेल्हापूर : लोकप्रतिनिधींनी समजूतदारपणा दाखविला आणि सरकारने लोकांना विश्वासात घेऊन त्यांना फायदे -तोटे पटवून दिले, तर कोल्हापूर शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली हद्दवाढीची मागणी मान्य होऊ शकेल. कधी ना कधी या प्रश्नाची कोंडी फुटलीच पाहिजे, या न्यायाने शेवटचा पर्याय म्हणून राज्य सकारने जर आपले अधिकार वापरण्याचे ठरविले तरीही शहराची हद्दवाढ होऊ शकते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, शहराच्या हद्दवाढीच्या मागणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. तसेच त्यांनी दिलेल्या ग्वाहीमुळे हद्दवाढ होईल, या कोल्हापूरकरांच्या अपेक्षांनाही बळ मिळाले. मागच्या सरकारमधील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीच्या मागणीला बगल देऊन कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण लादले होते, या प्राधिकरणामुळे ग्रामिण तसेच शहरी जनतेला काय फायदा झाला, विकास किती झाला, याचीही चर्चा आता नव्याने होईल.

सरकारच्या पैशावर ग्रामीण भागाचा विकास अवलंबून असल्याने महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शहरालगतची गावे किती सुधारली आणि १९७२ मध्ये नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर गेल्या ४८ वर्षांत शहराचा किती विकास झाला, याचा तौलनिक अभ्यासही व्हायला लागेल. सध्याचे चित्र पाहता, ग्रामीण भागात अद्याप पुरेशा नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळेच भौगोलिक सलगता असलेल्या ग्रामपंचायतींनी महापालिका हद्दीत समावेश करून घेणेच हिताचे ठरणार आहे.

-पुण्यात ग्रामपंचायतींचा आग्रह-

पुणे शहराची हद्दवाढ एकदम झाली नाही. १९९८ पासून आतापर्यंत पाचवेळा हद्दवाढ झाली. विशेष म्हणजे महापालिका हद्दीत गेल्यानंतर जमिनीला आलेली किंमत, मिळणाऱ्या नागरी सुविधा, विकास कामांना मिळणारा निधी याचा विचार करून तेथील ग्रामपंचायतींनी तसेच गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनीच महापालिकेत समाविष्ट होण्याचा आग्रह धरला होता. त्याचा अभ्यास कोल्हापुरातील ग्रामीण जनतेने केला पाहिजे.

- पहिल्या पाचमधील महापालिका २७ व्या स्थानी-

मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर नंतर स्थापन झालेली कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील पाचवी महानगरपालिका होती. पण शहराची हद्दवाढ सातत्याने डावलल्यामुळे ती आता राज्यातील महापालिकांच्या यादीत २७ व्या स्थानावर पोहोचली आहे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहर विस्तारले नाही. आडव्या विकासाऐवजी उभा विकास होत असून, त्यालाही आता मर्यादा आलेल्या आहेत.

- राज्य सरकारला अधिकार -

शहराची हद्दवाढ करण्याचा अधिकार सरकारला आहे. पुण्यात गेल्या महिन्यात जी हद्दवाढ झाली, ती अशीच झाली होती. तो अंतिम पर्याय राहील. परंतु एखाद्या प्रश्नाची सोडवणूक सर्वसंमतीने व चर्चेतून झालेली केव्हाही चांगलीच असेल. म्हणूनच सरकारनेही आता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

- चर्चेला तोंड फुटले, आता मोट बांधवी-

शहराच्या हद्दवाढीच्या मागणीस नव्याने तोंड फुटले आहे, त्यामुळे आता कोल्हापूरच्या पालकमंत्री यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर लोकांची मोट बांधावी. हद्दवाढीचे फायदे -तोटे लोकांना समजावून सांगावे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहराचे तसेच ग्रामीण भाग शहरात न आल्यामुळे काय नुकसान झाले, ते लोकांसमोर मांडावे. हद्दवाढ झाली, तर नुकसान कोणाचेही होणार नाही, उलट फायदाच होईल. या प्रश्नाची कोंडी फुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांना विश्वासात घ्यावे.

एस. एम. फडतरे,

सेवानिवृत्त नगररचना उपसंचालक

पुणे विभाग.