शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शहराच्या हद्दवाढीला आता दोनच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:17 IST

काेल्हापूर : लोकप्रतिनिधींनी समजूतदारपणा दाखविला आणि सरकारने लोकांना विश्वासात घेऊन त्यांना फायदे -तोटे पटवून दिले, तर कोल्हापूर शहराची गेल्या ...

काेल्हापूर : लोकप्रतिनिधींनी समजूतदारपणा दाखविला आणि सरकारने लोकांना विश्वासात घेऊन त्यांना फायदे -तोटे पटवून दिले, तर कोल्हापूर शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली हद्दवाढीची मागणी मान्य होऊ शकेल. कधी ना कधी या प्रश्नाची कोंडी फुटलीच पाहिजे, या न्यायाने शेवटचा पर्याय म्हणून राज्य सकारने जर आपले अधिकार वापरण्याचे ठरविले तरीही शहराची हद्दवाढ होऊ शकते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, शहराच्या हद्दवाढीच्या मागणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. तसेच त्यांनी दिलेल्या ग्वाहीमुळे हद्दवाढ होईल, या कोल्हापूरकरांच्या अपेक्षांनाही बळ मिळाले. मागच्या सरकारमधील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीच्या मागणीला बगल देऊन कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण लादले होते, या प्राधिकरणामुळे ग्रामिण तसेच शहरी जनतेला काय फायदा झाला, विकास किती झाला, याचीही चर्चा आता नव्याने होईल.

सरकारच्या पैशावर ग्रामीण भागाचा विकास अवलंबून असल्याने महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शहरालगतची गावे किती सुधारली आणि १९७२ मध्ये नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर गेल्या ४८ वर्षांत शहराचा किती विकास झाला, याचा तौलनिक अभ्यासही व्हायला लागेल. सध्याचे चित्र पाहता, ग्रामीण भागात अद्याप पुरेशा नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळेच भौगोलिक सलगता असलेल्या ग्रामपंचायतींनी महापालिका हद्दीत समावेश करून घेणेच हिताचे ठरणार आहे.

-पुण्यात ग्रामपंचायतींचा आग्रह-

पुणे शहराची हद्दवाढ एकदम झाली नाही. १९९८ पासून आतापर्यंत पाचवेळा हद्दवाढ झाली. विशेष म्हणजे महापालिका हद्दीत गेल्यानंतर जमिनीला आलेली किंमत, मिळणाऱ्या नागरी सुविधा, विकास कामांना मिळणारा निधी याचा विचार करून तेथील ग्रामपंचायतींनी तसेच गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनीच महापालिकेत समाविष्ट होण्याचा आग्रह धरला होता. त्याचा अभ्यास कोल्हापुरातील ग्रामीण जनतेने केला पाहिजे.

- पहिल्या पाचमधील महापालिका २७ व्या स्थानी-

मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर नंतर स्थापन झालेली कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील पाचवी महानगरपालिका होती. पण शहराची हद्दवाढ सातत्याने डावलल्यामुळे ती आता राज्यातील महापालिकांच्या यादीत २७ व्या स्थानावर पोहोचली आहे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहर विस्तारले नाही. आडव्या विकासाऐवजी उभा विकास होत असून, त्यालाही आता मर्यादा आलेल्या आहेत.

- राज्य सरकारला अधिकार -

शहराची हद्दवाढ करण्याचा अधिकार सरकारला आहे. पुण्यात गेल्या महिन्यात जी हद्दवाढ झाली, ती अशीच झाली होती. तो अंतिम पर्याय राहील. परंतु एखाद्या प्रश्नाची सोडवणूक सर्वसंमतीने व चर्चेतून झालेली केव्हाही चांगलीच असेल. म्हणूनच सरकारनेही आता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

- चर्चेला तोंड फुटले, आता मोट बांधवी-

शहराच्या हद्दवाढीच्या मागणीस नव्याने तोंड फुटले आहे, त्यामुळे आता कोल्हापूरच्या पालकमंत्री यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर लोकांची मोट बांधावी. हद्दवाढीचे फायदे -तोटे लोकांना समजावून सांगावे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहराचे तसेच ग्रामीण भाग शहरात न आल्यामुळे काय नुकसान झाले, ते लोकांसमोर मांडावे. हद्दवाढ झाली, तर नुकसान कोणाचेही होणार नाही, उलट फायदाच होईल. या प्रश्नाची कोंडी फुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांना विश्वासात घ्यावे.

एस. एम. फडतरे,

सेवानिवृत्त नगररचना उपसंचालक

पुणे विभाग.