शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:30 IST

मलकापूर प्रतिनिधी : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी ते लव्हालादरम्यान रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांतून साखर, कांदा, बटाटे यांची चोरी करणारी टोळी ...

मलकापूर प्रतिनिधी : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी ते लव्हालादरम्यान रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांतून साखर, कांदा, बटाटे यांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शाहूवाडी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली पाहिजे.

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या मालवाहतुकीच्या गाड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.

कोकणातील जयगड बंदरामुळे साखर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज साखरेचे सुमारे १०० ट्रक ये-जा करीत असतात. ट्रकचालक रात्रीच्या वेळी ट्रक रस्त्याकडेला लावून जेवणासाठी थांबतात, अशा वेळी अंधाराचा फायदा घेऊन ट्रकमधून साखरेची पोत्यांची चोरी केली जाते. मलकापूर , शाहूवाडी बाजारातील कांदे, बटाट्यांच्या पोत्यांची चोरी रात्रीच्या वेळी केली जात आहे. कांदा, बटाटा घेऊन जाणाऱ्या थांबलेल्या टेम्पोतून पोत्यांची चोरी केली जात आहे. त्यामुळे किरकोळ, घाऊक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शाहूवाडी पोलिसानी एका सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्याला साखर पोती चोरीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चार दिवसांपूर्वी वारूळ येथे रस्त्याकडेला लावलेल्या ट्रकमधून साखरेची पोती चोरीला गेली, अशी चर्चा नागरिकांत सुरू होती. शाहूवाडी पोलिसांनी अशा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या पहिजेत.