शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा समित्या पुनर्रचनेविना ‘निराधार’

By admin | Updated: September 18, 2015 00:44 IST

पालकमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा : पाच तालुक्यांत पुनर्रचना; सध्या तहसीलदार सर्वेसर्वा

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर  गरीब, दुर्बल, कमकुवत लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय, विशेष साहाय्य विभागाकडून दरमहा अर्थसाहाय्यासाठी पात्र लाभार्थी निवडीसाठीच्या दहा समित्यांची पुनर्रचना आठ महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. समिती पुनर्रचनेचे सर्वाधिकार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आहे. त्यांचा आदेश नसल्याने समितीच्या पुनर्रचना झालेली नाही. परिणामी जिल्ह्यातील दहा समितींचा कारभार तहसीलदार सांभाळत आहेत. त्या समित्याच सदस्यांविना निराधार झाल्यामुळे गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात मर्यादा येत आहेत. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ, आदी योजना आहेत. जिल्हास्तरावरून महसूल उपजिल्हाधिकारी, तर गावपातळीवर तलाठीतर्फे योजनांची अंमलबजावणी होते. पात्र लाभार्थी निवडीची प्रक्रिया जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना समितीतर्फे केली जाते. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार समितीची रचना होते. सत्ता असल्यास संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदार किंवा विश्वासू कार्यकर्त्यास अध्यक्ष म्हणून संधी देऊ शकतात. सत्ता नसल्यास पालकमंत्री आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यास अध्यक्ष, अशासकीय सदस्य म्हणून संधी दिली जाते. समितीमध्ये अशासकीय पाच, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशी एकूण सातजणांची समिती असते. या समितीच्या बैठकीत पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. समितीचे सचिव लाभार्थींचे प्रस्ताव तहसीलदारांतर्फे शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य सुरू होते. गेल्या १५ वर्षांपासून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे समितीमध्ये फारसा बदल झाला नाही. आठ महिन्यांपूर्वी नवीन भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे त्यांनी जुन्या सर्व समित्या बरखास्त केल्या. पालकमंत्री पाटील यांच्या आदेशानुसार नव्या समितीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. पण, नवे शासन येऊन वर्ष होत आले तरी समित्यांची पुनर्रचना झाली नाही. ज्या ठिकाणी समित्यांची पुनर्रचना झालेली नाही, त्या ठिकाणी तहसीलदारच लाभार्थी निवडीत सर्वेसर्वा आहेत. लाभार्थ्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावावेगवेगळ्या निवडणुकीत मतांच्या रूपाने फायदा व्हावा म्हणून अपात्र असला तरी लाभार्थ्यास कागदोपत्री पात्र ठरवून ‘घुसडण्या’चा प्रयत्न होतो. समितीमध्ये ‘अशासकीय सदस्यां’चे बहुमत असते. दबावामुळे समितीमधील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना अपात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव नाकारण्याची ‘हिंमत’ होत नाही. दहा ठिकाणी समितीची पुनर्रचना न झाल्यामुळे अपात्र लाभार्थी घुसडण्याचा दबावातून प्रशासनाची सुटका झाली आहे. पण, दुसऱ्या बाजूला समित्याच अस्तित्वात नसल्याने थेट लाभार्थीच प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.कोणत्या समितीचीपुनर्रचना नाही ?कागल, हातकणंगले, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा या पाच ठिकाणी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. उर्वरित कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, चंदगड येथील समितींची पुनर्रचना झालेली नाही. पाच ठिकाणी समितीची पुनर्रचना झाली आहे. उर्वरित ठिकाणी समितीची पुनर्रचना झाली नसली तरी पात्र लाभार्थी निवडीची नियमित प्रक्रिया संबंधित तहसीलदारांतर्फे सुरू आहे. - किरण कुलकर्णी,उपजिल्हाधिकारी (महसूल)