शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

ग्राहकांच्या इच्छेपोटी बांधले सात लाखांचे मंदिर

By admin | Updated: June 3, 2017 00:55 IST

ग्राहकांच्या इच्छेपोटी बांधले सात लाखांचे मंदिर

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वर्षानुवर्षे या गावची गिऱ्हाईक मंडळी एकाच दुकानातून खरेदी करीत होती. त्यातूनच मग विठ्ठलावर भक्ती असणाऱ्या दुकानदाराचे आणि त्यांचे स्नेहबंध जुळले. अशातच गावात एकही मंदिर नाही. आहे ते मंदिर गावाबाहेर आहे. पावसाळ्यात तिकडे जाता येत नाही, अशी खंत या गिऱ्हाईकांनी सहज बोलता-बोलता सांगितली. दुकानदारांनी लगेच निर्णय घेतला आणि सहा महिन्यांत वैयक्तिक सात लाख रुपये खर्च करून या गिऱ्हाईकांसाठी त्यांच्या गावात एक उत्तम असे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभारले. आजरा तालुक्यातील चितळे ग्रामस्थ आणि आजऱ्यातील प्रतिष्ठित दुकानदार मधुकर क्रमित यांच्यातील या आपुलकीच्या संबंधांना या मंदिर उभारणीमुळे भक्तिभावाची झळाळी आली. मधुकर क्रमित यांचे आजऱ्यातील मंडईशेजारी अनेक वर्षे दुकान होते. त्यांच्या वडिलांनी हे किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. व्यवसायातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संबंध वृद्धिंगत होत गेले आणि चितळे ग्रामस्थांसाठी क्रमित यांचे मंडईशेजारील दुकान हक्काचे ठिकाण बनले. धार्मिक कार्यासाठी आणि इतरांना ही विद्या शिकविण्यासाठी मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या क्रमित यांच्या पूर्वजांना आजऱ्यात इचलकरंजीच्या घोरपडे सरकारांनी आणले. त्यामुळे क्रमित यांचा ओढा कीर्तन, भजनाकडे अधिक. क्रमित यांनी सत्तरी पार केलेली. दोन्ही मुले चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीला. मुलीही त्यांच्या संसारात सुखी. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका पत्नी माधुरी यांच्या निधनानंतर मात्र ते अधिकच हळवे बनले.गेल्यावर्षी दुकानात बसणाऱ्या चितळे ग्रामस्थांनी गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर नसल्याची खंत व्यक्त केली. बांधलेले रवळनाथाचे मंदिर गावापासून दीड फर्लांगावर आहे, पावसाळ्यात ओढ्याला पूर येत असल्याने तिकडे चार-चार महिने जाताही येत नाही, अशीही व्यथा त्यांनी बोलून दाखविली. गावात मंदिर नाही याची रुखरुख क्रमित यांनाही लागून राहिली. त्यांनी थेट निर्णय घेतला आणि मंदिरांच्या बांधकामाला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात या मंदिराची वास्तुशांती झाली. अंगात दीड ताप असणारे क्रमित या सोहळ्याला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांच्या मिलिंद आणि मंदार या मुलांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांबरोबरच परिश्रम घेतले.मशिदींनाही मदतकेवळ मंदिरांसाठी निधी न देता आजऱ्यातील सर्व मशिदींनाही देणगी देण्याची भूमिका क्रमित यांनी घेतली. वाडा गल्लीतील मशिदीसाठी २५ हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली. जनता शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांनाही त्यांनी देणगी दिली आहे.