शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

दूरशिक्षणचे विद्यार्थी परीक्षेपासूनही ‘दूर’

By admin | Updated: May 12, 2015 00:16 IST

विद्यापीठाचा कारभार : प्रश्नपत्रिकाच बनविली नाही

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी विषय निवडला. त्यानुसार अर्ज भरला. परीक्षेचे प्रवेशपत्र देखील मिळाले. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर प्रश्नपत्रिका बनविली नसल्याने पेपर होणार नसल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. शिवाजी विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा सोमवारी दूरशिक्षण विभागातील एम.ए.च्या द्वितीय वर्षांतील समाजशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना फटका बसला.समाजशास्त्र शाखेतील सत्र चारची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. पहिला पेपर ‘एनव्हायरर्नमेंट अँड सोसायटी इन इंडिया’हा दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेत होणार होता. त्यासाठी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास विद्यार्थी विद्यापीठाने दिलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. यात दूरशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. वीस गुणांचे प्रात्यक्षिक असल्याने नियमित विद्यार्थ्यांनाच हा ८० गुणांचा पेपर देता येणार होता. पण, नियमित विद्यार्थी नसल्याने प्रश्नपत्रिकाच बनविली नव्हती. शहरातील केएमसी कॉलेज केंद्रावर बैठक व्यवस्था असलेल्या २० हून अधिक दूरशिक्षणच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बनविली नसल्याने तुमची परीक्षा घेण्यात येऊ नये, असा विद्यापीठाचा निरोप असल्याचे पर्यवेक्षकांनी सांगितले. तसेच अधिक माहितीसाठी विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अशीच अवस्था कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील केंद्रांवरील अन्य विद्यार्थ्यांची झाली. त्यावर काही विद्यार्थी दूरशिक्षण विभागात पोहोचले. याठिकाणी त्यांना परीक्षा भवनात जाण्यास सांगितले. परीक्षा भवनात संबंधित विद्यार्थ्यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रक जी. आर. पळसे यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. तसेच आमचे हे अंतिम वर्ष असल्याने पेपर घ्यावा, अशी विनंती केली. पेपर घेण्याचे मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)आमचा दोष काय?विषयाबाबतची तांत्रिक अडचण यापूर्वीच परीक्षा विभागाच्या लक्षात येणे आवश्यक होते. त्यानुसार विषय बदलावा, अशी सूचना प्रत्यक्षात अथवा एसएमएसद्वारे देणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. वर्षभर अभ्यास करून केंद्रावर गेल्यावर पेपर होणार नाही, हे विद्यापीठाकडून सांगणे चुकीचे आहे. त्यांच्या चुकीत आमचा दोष काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला.रविवारी होणार पेपर...नियमित विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याने संबंधित पेपरसाठी नोंदणी केली नव्हती. त्यामुळे या विषयाचा पेपर सेटिंग करण्यात आला नाही. मात्र, दूरशिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी नेट कॅफेवरून अर्ज भरल्यामुळे त्यांनी प्रात्यक्षिक असलेल्या या विषयाची निवड केल्याचे सोमवारी लक्षात आले. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे प्रभारी परीक्षा नियंत्रक जी. आर. पळसे यांनी सांगितले.