शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

जिल्हा बॅँकेतील ठेवींच्या व्याजावरही ‘टीडीएस’

By admin | Updated: July 10, 2015 00:50 IST

ठेवीदार हवालदिल : कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा लाख शेतकऱ्यांना फटका

विश्वास पाटील-कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत (केडीसीसी) ठेवलेल्या ठेवींवरील व्याज दहा हजारांहून जास्त झाल्यास त्यातून वीस टक्के टीडीएस कपात करून घेतली जात असल्याने ठेवीदारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत; परंतु टीडीएस कपातीचा निर्णय आयकर विभागाचा आहे. त्याची अंमलबजावणी फक्त बँकेतर्फे सुरू असून, केंद्र सरकारच्या धोरणानुसारच ही कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. बँकेच्या सुमारे सव्वा लाखांहून अधिक ठेवीदार शेतकऱ्यांना नव्या नियमाचा फटका बसत आहे.आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांतीलच ठेवींवरील व्याजातून टीडीएस कपात करून घेतली जात होती; परंतु केंद्रातील भाजप सरकारने एप्रिलपासून त्यामध्ये देशभरातील जिल्हा बँकांनाही समाविष्ट केले आहे. त्यासंबंधीचे आदेश जिल्हा बँकेलाही आले आहेत. त्यामुळे बँकेने १ एप्रिल ते ३० जून या तिमाहीतील व्याज रकमेतून टीडीएस कपात सुरू केली आहे. त्यामुळे ठेवीदारांतून नाराजी व्यक्त केली जात आहे; परंतु हा निर्णय जिल्हा बँकेचा नाही. तो केंद्र सरकारने घेतला असून, राज्यातील सगळ््या जिल्हा बँकांनी त्याविरोधात आवाज उठवूनही सरकार त्यातून सवलत द्यायला तयार नाही.मागच्या दहा वर्षांत पतसंस्थांची चळवळ भ्रष्टाचारामुळे मोडली. राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव ठेवायची झाल्यास गावोगावी त्यांचे नेटवर्क नाही शिवाय गरजेला तातडीने पैसे हवे असतील तर इतक्या सुलभपणे मिळत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये ठेव ठेवतो. आता ही गुंतवणूकही आयकर विभागाच्या रडारवर आल्याने कर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांत त्याबद्दल भीतीच जास्त आहे. त्यातून नवी झंझट मागे लागेल की काय, अशी भीती त्यास वाटते.७० टक्के खातेदारांकडे पॅनकार्डच नाहीजिल्हा बँकेचे बचतखाते असलेले सुमारे १० लाखांहून जास्त ग्राहक आहेत. परंतू त्यातील ७० टक्क्यांहून जास्त लोकांकडे पॅनकार्ड नाही. कारण ते काढून घेण्याची तसदीच त्याने कधी घेतलेली नाही. त्यामुळे बँकेनेच आता त्याबद्दल जनजागरण करून गावोगावच्या शाखेतून पॅनकार्ड काढून देण्याची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.व्याजाला सोकला आणि मुद्दलीला मुकला...केडीसीच्या शाखेत टीडीएस भरावा लागतो म्हणून ठेव काढून ती दुसरीकडे कुठेही ठेवायची झाल्यास तिथेही ‘टीडीएस’ आहेच. आता के्रडिट सोसायटी व पतसंस्थेतील ठेवींवर ही कपात नाही परंतु या संस्थांचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे चार पैसे कर द्यावा लागतो म्हणून जिल्हा बँकेतील ठेव काढली तर व्याजासाठी मुद्दल अडचणीत येण्याचा धोका आहे. त्यापेक्षा कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे ठेवी ठेवणे हादेखील पर्याय आहे.जिल्हा बँकेच्या ठेवींचा सरासरी व्याजदर साडेनऊ टक्के आहे. ज्यांची एक लाखांहून जास्त व एक वर्षापेक्षा जास्त मुदत असलेल्या ठेवींवर दहा हजारांहून जास्त व्याज होते. त्या शेतकऱ्याचे पॅनकार्ड नसेल तर त्यातून दोन हजार रुपये कपात करून घेण्यात येत आहेत. त्यामुळे दहा हजारांचा स्लॅब किमान ५० हजारांपर्यंत करावा, अशी मागणी होत आहे, परंतु त्यासाठी सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे.उपाय काय...६० वर्षांखालील शेतकरी आणि अडीच लाख रुपये उत्पन्न असल्यास त्याने ‘१५ जी’ हा फॉर्म भरून दिल्यास कपात नाही.६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न असल्यास ‘१५ एच’ हा फॉर्म भरून दिल्यास कपात नाही.