शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाठिंबा मागण्याचा हक्क ‘ताराराणी’ने अगोदरच गमावला

By admin | Updated: November 7, 2015 00:15 IST

जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर : महापौर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच

कोल्हापूर : व्यक्तिगत जीवन असो की राजकारण, प्रत्येकाला कायमच दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागतो; परंतु राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करून ताराराणी आघाडीने पाठिंबा मागण्याचा हक्क गमावला असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. जयंत पाटील यांनी दिले आहे. तिन्ही अपक्षांनी आमच्या आघाडीला पाठिंबा दिला असून, कोणत्याही स्थितीत महापौर आमचाच होईल, असा दावा प्रा. पाटील यांनी केला. पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही बहुमताबाबत करीत असलेले दावे व आकडेमोड पाहून गंमत वाटत आहे. दोन्ही काँग्रेस निवडणुकीत विरोधात लढले; परंतु त्यांनी परस्परांवर कधीच टीका केली नाही. कारण निवडणुकीनंतर एकत्र यावे लागले तर पर्याय खुला असावा, अशी रणनीती त्यामागे होती. याउलट ताराराणी आघाडीचा मुख्य शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेसच होता. माजी महापौर सुनील कदम यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. या टीकेस आमदार महादेवराव महाडिक यांची संमती आहे का, याचा खुलासा करण्याची मुश्रीफ यांनी मागणी केली होती; परंतु महाडिक त्याबद्दल अजूनही काही बोलले नाहीत. असे असताना ताराराणी किंवा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. तो हक्क त्यांनी गमावला आहे. भाजपचा महापौर केला नाही तर निधी देणार नाही, अशी भीती पालकमंत्री घालत आहेत का? अशी विचारणा करून प्रा. पाटील म्हणाले, ‘यापूर्वी शिवसेनेचे सरकार आले तेव्हा राज्यातील महापालिका बंद पडल्या होत्या का? सरकार राज्याच्या तिजोरीतून निधी देते. तो भाजपच्या फंडातून दिला जात नाही, याचीही आठवण पाटील यांनी करून दिली.