शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाठिंबा मागण्याचा हक्क ‘ताराराणी’ने अगोदरच गमावला

By admin | Updated: November 7, 2015 00:15 IST

जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर : महापौर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच

कोल्हापूर : व्यक्तिगत जीवन असो की राजकारण, प्रत्येकाला कायमच दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागतो; परंतु राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करून ताराराणी आघाडीने पाठिंबा मागण्याचा हक्क गमावला असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. जयंत पाटील यांनी दिले आहे. तिन्ही अपक्षांनी आमच्या आघाडीला पाठिंबा दिला असून, कोणत्याही स्थितीत महापौर आमचाच होईल, असा दावा प्रा. पाटील यांनी केला. पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही बहुमताबाबत करीत असलेले दावे व आकडेमोड पाहून गंमत वाटत आहे. दोन्ही काँग्रेस निवडणुकीत विरोधात लढले; परंतु त्यांनी परस्परांवर कधीच टीका केली नाही. कारण निवडणुकीनंतर एकत्र यावे लागले तर पर्याय खुला असावा, अशी रणनीती त्यामागे होती. याउलट ताराराणी आघाडीचा मुख्य शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेसच होता. माजी महापौर सुनील कदम यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. या टीकेस आमदार महादेवराव महाडिक यांची संमती आहे का, याचा खुलासा करण्याची मुश्रीफ यांनी मागणी केली होती; परंतु महाडिक त्याबद्दल अजूनही काही बोलले नाहीत. असे असताना ताराराणी किंवा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. तो हक्क त्यांनी गमावला आहे. भाजपचा महापौर केला नाही तर निधी देणार नाही, अशी भीती पालकमंत्री घालत आहेत का? अशी विचारणा करून प्रा. पाटील म्हणाले, ‘यापूर्वी शिवसेनेचे सरकार आले तेव्हा राज्यातील महापालिका बंद पडल्या होत्या का? सरकार राज्याच्या तिजोरीतून निधी देते. तो भाजपच्या फंडातून दिला जात नाही, याचीही आठवण पाटील यांनी करून दिली.