शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

नागदेववाडीतील वंचित पूरग्रस्त ग्रामस्थांकडून तलाठी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर ...

कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. सोमवारी नागदेववाडीतील वंचित ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना भेटून धारेवर धरले व पहिल्या यादीतील पूरग्रस्तांची वगळलेली नावे कोणाच्या सांगण्यावरून वगळली, असा जाब विचारत धारेवर धरले.

यावेळी सरपंच योगेश ढेंगे व ग्रामस्थांनी तलाठी काटकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे नाईलाजास्तव तहसीलदारांना या यादीची माहिती देतो, असे सांगून ग्रामस्थांना तहसीलदार कार्यालयाकडे तलाठी काटकर घेऊन गेले. परंतु, तहसीलदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याने बराचवेळ ग्रामस्थांना येथे तिष्ठत बसावे लागले.

दि. २२ जुलैला मुसळधार पाऊस झाल्याने नागदेववाडीत महापुराचे पाणी नागरी वस्तीत घुसले होते. २०१९पेक्षाही यावर्षी जास्त आलेल्या पुरामुळे पाणी पातळी वाढली होती. यामुळे नागदेववाडीतील ढेंगे गल्ली, ढेरे गल्ली, निगडे गल्ली, दिवसे गल्ली, मोहिते गल्लीतील तीनशे ते सव्वातीनशे घरांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. यावेळी ग्रामसेवक, ग्रामपंचायत व तलाठी यांनी महापुराची पाहणी करून पूररेषा आखली होती. प्राथमिक यादीत ३१७ पूरग्रस्तांची सानुग्रह अनुदानासाठी यादी तयार केली होती. पण दुसऱ्या यादीत यातील ८० पूरग्रस्तांची नावे वगळून निर्वाह यादीत समाविष्ट केली. यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावून तलाठ्यांना फोन केले. पण तलाठी नागदेववाडीत आले नाहीत म्हणून वंचित पूरग्रस्त ग्रामस्थ शिंगणापूर येथे असलेल्या तलाठी कार्यालयात गेले.

यावेळी सरपंच योगेश ढेंगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून ८० पूरग्रस्तांची नावे वगळली, असा प्रश्न केला. यावर तलाठ्यांनी यादी जाहीर केली नसल्याचा बनाव केला. त्यावर सरपंच ढेंगे यांनी ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलेली यादी कुठली, असा प्रश्न केला. राजेंद्र दिवसे म्हणाले, तुम्ही पुराच्या काळात नागदेववाडीतील पूरस्थितीची पहाणी केली. यावेळी ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी यादी तयार केली. पूरग्रस्तांची नावे वगळताना ग्रामसेवकांबरोबर चर्चा केली होती का? तुमचे या यादीवर एकमत झाले नाही का? असा प्रश्न केला. यावेळी तलाठ्यांनी घुमजाव करत पंचनाम्याच्या यादीवर तहसीलदार कार्यालयात चर्चा करुया, असे म्हणून ते ग्रामस्थांना घेऊन या कार्यालयात गेले.

फोटो

१) नागदेववाडीतील ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना धारेवर धरले.