शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागदेववाडीतील वंचित पूरग्रस्त ग्रामस्थांकडून तलाठी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर ...

कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. सोमवारी नागदेववाडीतील वंचित ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना भेटून धारेवर धरले व पहिल्या यादीतील पूरग्रस्तांची वगळलेली नावे कोणाच्या सांगण्यावरून वगळली, असा जाब विचारत धारेवर धरले.

यावेळी सरपंच योगेश ढेंगे व ग्रामस्थांनी तलाठी काटकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे नाईलाजास्तव तहसीलदारांना या यादीची माहिती देतो, असे सांगून ग्रामस्थांना तहसीलदार कार्यालयाकडे तलाठी काटकर घेऊन गेले. परंतु, तहसीलदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याने बराचवेळ ग्रामस्थांना येथे तिष्ठत बसावे लागले.

दि. २२ जुलैला मुसळधार पाऊस झाल्याने नागदेववाडीत महापुराचे पाणी नागरी वस्तीत घुसले होते. २०१९पेक्षाही यावर्षी जास्त आलेल्या पुरामुळे पाणी पातळी वाढली होती. यामुळे नागदेववाडीतील ढेंगे गल्ली, ढेरे गल्ली, निगडे गल्ली, दिवसे गल्ली, मोहिते गल्लीतील तीनशे ते सव्वातीनशे घरांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. यावेळी ग्रामसेवक, ग्रामपंचायत व तलाठी यांनी महापुराची पाहणी करून पूररेषा आखली होती. प्राथमिक यादीत ३१७ पूरग्रस्तांची सानुग्रह अनुदानासाठी यादी तयार केली होती. पण दुसऱ्या यादीत यातील ८० पूरग्रस्तांची नावे वगळून निर्वाह यादीत समाविष्ट केली. यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावून तलाठ्यांना फोन केले. पण तलाठी नागदेववाडीत आले नाहीत म्हणून वंचित पूरग्रस्त ग्रामस्थ शिंगणापूर येथे असलेल्या तलाठी कार्यालयात गेले.

यावेळी सरपंच योगेश ढेंगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून ८० पूरग्रस्तांची नावे वगळली, असा प्रश्न केला. यावर तलाठ्यांनी यादी जाहीर केली नसल्याचा बनाव केला. त्यावर सरपंच ढेंगे यांनी ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलेली यादी कुठली, असा प्रश्न केला. राजेंद्र दिवसे म्हणाले, तुम्ही पुराच्या काळात नागदेववाडीतील पूरस्थितीची पहाणी केली. यावेळी ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी यादी तयार केली. पूरग्रस्तांची नावे वगळताना ग्रामसेवकांबरोबर चर्चा केली होती का? तुमचे या यादीवर एकमत झाले नाही का? असा प्रश्न केला. यावेळी तलाठ्यांनी घुमजाव करत पंचनाम्याच्या यादीवर तहसीलदार कार्यालयात चर्चा करुया, असे म्हणून ते ग्रामस्थांना घेऊन या कार्यालयात गेले.

फोटो

१) नागदेववाडीतील ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना धारेवर धरले.