शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

नागदेववाडीतील वंचित पूरग्रस्त ग्रामस्थांकडून तलाठी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर ...

कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. सोमवारी नागदेववाडीतील वंचित ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना भेटून धारेवर धरले व पहिल्या यादीतील पूरग्रस्तांची वगळलेली नावे कोणाच्या सांगण्यावरून वगळली, असा जाब विचारत धारेवर धरले.

यावेळी सरपंच योगेश ढेंगे व ग्रामस्थांनी तलाठी काटकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे नाईलाजास्तव तहसीलदारांना या यादीची माहिती देतो, असे सांगून ग्रामस्थांना तहसीलदार कार्यालयाकडे तलाठी काटकर घेऊन गेले. परंतु, तहसीलदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याने बराचवेळ ग्रामस्थांना येथे तिष्ठत बसावे लागले.

दि. २२ जुलैला मुसळधार पाऊस झाल्याने नागदेववाडीत महापुराचे पाणी नागरी वस्तीत घुसले होते. २०१९पेक्षाही यावर्षी जास्त आलेल्या पुरामुळे पाणी पातळी वाढली होती. यामुळे नागदेववाडीतील ढेंगे गल्ली, ढेरे गल्ली, निगडे गल्ली, दिवसे गल्ली, मोहिते गल्लीतील तीनशे ते सव्वातीनशे घरांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. यावेळी ग्रामसेवक, ग्रामपंचायत व तलाठी यांनी महापुराची पाहणी करून पूररेषा आखली होती. प्राथमिक यादीत ३१७ पूरग्रस्तांची सानुग्रह अनुदानासाठी यादी तयार केली होती. पण दुसऱ्या यादीत यातील ८० पूरग्रस्तांची नावे वगळून निर्वाह यादीत समाविष्ट केली. यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावून तलाठ्यांना फोन केले. पण तलाठी नागदेववाडीत आले नाहीत म्हणून वंचित पूरग्रस्त ग्रामस्थ शिंगणापूर येथे असलेल्या तलाठी कार्यालयात गेले.

यावेळी सरपंच योगेश ढेंगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून ८० पूरग्रस्तांची नावे वगळली, असा प्रश्न केला. यावर तलाठ्यांनी यादी जाहीर केली नसल्याचा बनाव केला. त्यावर सरपंच ढेंगे यांनी ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलेली यादी कुठली, असा प्रश्न केला. राजेंद्र दिवसे म्हणाले, तुम्ही पुराच्या काळात नागदेववाडीतील पूरस्थितीची पहाणी केली. यावेळी ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी यादी तयार केली. पूरग्रस्तांची नावे वगळताना ग्रामसेवकांबरोबर चर्चा केली होती का? तुमचे या यादीवर एकमत झाले नाही का? असा प्रश्न केला. यावेळी तलाठ्यांनी घुमजाव करत पंचनाम्याच्या यादीवर तहसीलदार कार्यालयात चर्चा करुया, असे म्हणून ते ग्रामस्थांना घेऊन या कार्यालयात गेले.

फोटो

१) नागदेववाडीतील ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना धारेवर धरले.