शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या सुरक्षेची ऐसी की तैसी

By admin | Updated: November 2, 2014 23:30 IST

कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दिवसेंदिवस अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढू लागले

बालेचॉँद हेरवाडे - पट्टणकोडोली -योग्य प्रशिक्षण व कामगारांच्या सुरक्षिततेच्या नियमाला धाब्यावर बसवून कंपनी प्रशासन वर्क आॅर्डर वाढविण्यासाठी कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. धोकादायक परिस्थितीमध्ये मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊनही अनेक फौंड्री कंपन्यांमध्ये कामगार काम करीत आहेत. त्यामुळे कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दिवसेंदिवस अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. कागल-हातकणंगले फाईव्हस्टार एमआयडीसी हजारो बेरोजगारांसाठी विकासाची पर्वणी ठरत असली तरीही प्रशिक्षित ठेकेदार आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनाकडील दुर्लक्षामुळे अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे. याठिकाणी फौंड्री कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून जॉब (पार्ट) तयार करत असताना धातूचा रस (पोरींग) ओतणीपासून, नॉकआऊट, मोल्डींग, मेल्टींग, फिटलिंग, कोअर शॉप व लोडींग अशी धोकादायक कामे करावी लागतात. ही कामे करत असताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, बूट, हॅन्डग्लोज व गॉगल्स देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र बहुतांशी कंपन्यांमध्ये हे नियम धाब्यावर बसवून कामगारांना केवळ बूट व हॅन्डग्लोज पुरवले जातात. केवळ ग्रुप इन्शोरन्सच्या जोरावर कामगारांकडून धोकादायक कामे करून घेतली जातात. अपघातात यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षभरात पट्टणकोडोली येथील दोघा कामगारांना जीव गमवावा लागला आहे. कामगारांना सुरक्षिततेच्या उपाययोजना मिळत नसल्याने अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून केवळ सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देण्यापलीकडे कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत.दरम्यान, फौंड्री कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातातून मृत्यू झालेली अथवा अपंगत्व मिळालेल्या कामगारांची प्रकरणे दडपली जातात. तसेच अनेक कंपन्यांकडून हितसंबंध जपण्यासाठी ठेकेदारांच्या नावावर कंपनी प्रशासन स्वत:च ठेका चालवत आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा करणाऱ्या अशा कंपन्यांवर सहायक कामगार आयुक्त व सहसंचालक यांनी प्रत्यक्षात तपासणी करून कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.कंपनी प्रशासन केवळ उत्पादन वाढविण्यासाठी स्थानिक विना परवाना ठेकेदारांना कामाचे ठेके सर्रास देत आहेत. संबंधित ठेकेदारांच्या कामातील अनुभव कमी असल्याने संभाव्य धोक्यांचाही अंदाज नसतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात नाहीत. केवळ प्रति कामगारांमागील कमिशन मिळविण्याच्या प्रयत्नात कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकारही घडत आहे.