शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या सुरक्षेची ऐसी की तैसी

By admin | Updated: November 2, 2014 23:30 IST

कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दिवसेंदिवस अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढू लागले

बालेचॉँद हेरवाडे - पट्टणकोडोली -योग्य प्रशिक्षण व कामगारांच्या सुरक्षिततेच्या नियमाला धाब्यावर बसवून कंपनी प्रशासन वर्क आॅर्डर वाढविण्यासाठी कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. धोकादायक परिस्थितीमध्ये मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊनही अनेक फौंड्री कंपन्यांमध्ये कामगार काम करीत आहेत. त्यामुळे कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दिवसेंदिवस अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. कागल-हातकणंगले फाईव्हस्टार एमआयडीसी हजारो बेरोजगारांसाठी विकासाची पर्वणी ठरत असली तरीही प्रशिक्षित ठेकेदार आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनाकडील दुर्लक्षामुळे अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे. याठिकाणी फौंड्री कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून जॉब (पार्ट) तयार करत असताना धातूचा रस (पोरींग) ओतणीपासून, नॉकआऊट, मोल्डींग, मेल्टींग, फिटलिंग, कोअर शॉप व लोडींग अशी धोकादायक कामे करावी लागतात. ही कामे करत असताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, बूट, हॅन्डग्लोज व गॉगल्स देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र बहुतांशी कंपन्यांमध्ये हे नियम धाब्यावर बसवून कामगारांना केवळ बूट व हॅन्डग्लोज पुरवले जातात. केवळ ग्रुप इन्शोरन्सच्या जोरावर कामगारांकडून धोकादायक कामे करून घेतली जातात. अपघातात यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षभरात पट्टणकोडोली येथील दोघा कामगारांना जीव गमवावा लागला आहे. कामगारांना सुरक्षिततेच्या उपाययोजना मिळत नसल्याने अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून केवळ सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देण्यापलीकडे कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत.दरम्यान, फौंड्री कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातातून मृत्यू झालेली अथवा अपंगत्व मिळालेल्या कामगारांची प्रकरणे दडपली जातात. तसेच अनेक कंपन्यांकडून हितसंबंध जपण्यासाठी ठेकेदारांच्या नावावर कंपनी प्रशासन स्वत:च ठेका चालवत आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा करणाऱ्या अशा कंपन्यांवर सहायक कामगार आयुक्त व सहसंचालक यांनी प्रत्यक्षात तपासणी करून कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.कंपनी प्रशासन केवळ उत्पादन वाढविण्यासाठी स्थानिक विना परवाना ठेकेदारांना कामाचे ठेके सर्रास देत आहेत. संबंधित ठेकेदारांच्या कामातील अनुभव कमी असल्याने संभाव्य धोक्यांचाही अंदाज नसतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात नाहीत. केवळ प्रति कामगारांमागील कमिशन मिळविण्याच्या प्रयत्नात कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकारही घडत आहे.