शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

अन्नदात्यासाठी शनिवारी रस्त्यावर उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST

कोल्हापूर : दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचा मोदी सरकारकडून छळ मांडण्यात आला आहे. जमीन वाचविण्यासाठीच्या संघर्षात शंभराहून अधिक शेतकऱ्यांची आहुती ...

कोल्हापूर : दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचा मोदी सरकारकडून छळ मांडण्यात आला आहे. जमीन वाचविण्यासाठीच्या संघर्षात शंभराहून अधिक शेतकऱ्यांची आहुती गेली. चर्चेच्या फेऱ्या झाल्या तरी यातून मार्ग निघेना झाला आहे. ७० दिवसांहून अधिक काळ कडाक्याच्या थंडीत प्रशासनाची अवकृपा झेलत बसलेल्या या अन्नदाता शेतकऱ्यांसाठी किमान एक दिवस रस्त्यावर उतरा आणि हुकूमशाही सरकारला वठणीवर आणा, असे कळकळीचे आवाहन किसान संघर्ष समन्वय समितीने केले आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या अन्यायी भूमिकेचा निषेध म्हणून आज, शनिवारी देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आंदोलनात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या कोल्हापुरातही दाभोळकर कॉर्नर चौकात दोन तास चक्का जाम आंदोलन करून शहरवासीयांचे शेतकऱ्यांच्या वेदनांकडे लक्ष वेधले जाणार आहे. समन्वय समिती व घटक संघटनांची किसान सभेचे नामदेव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. सकाळी ११ वाजता दाभोळक़र काॅर्नर चौकात एकत्र जमून दुपारी एकपर्यंत वाहने अडवून धरली जाणार आहेत. हा रस्ता शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. पाच मिनिटे जरी वाहतूक थांबली तर वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा लागतात. शेतकऱ्यांच्या व्यथांची शहरवासीयांना जाणीव व्हावी म्हणूनच हा मार्ग निवडला असल्याचे नामदेव गावडे यांनी सांगितले. शहरात एकाच ठिकाणी आंदोलन होणार असल्याने समन्वय समितीशी संलग्न संघटना पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबतच्या नागरिकांना येथेच एकत्र आणावे, तालुका पातळीवर निदर्शने होणार नाहीत, अशा सूचना दिल्या आहेत. बैठकीत सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, चंद्रकांत यादव, बाबूराव कदम, वसंतराव पाटील, रमेश वडणगेकर, दिलदार मुजावर, नामदेव पाटील, सुशांत बोरगे, बाळासाहेब बर्गे यांनी सहभाग घेतला.