शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पाचट कुजवा, पाणीटंचाईला दूर पळवा

By admin | Updated: January 12, 2016 00:42 IST

लाखमोलाचे सेंद्रिय खत : उत्पादन खर्चही कमी; जिल्हा परिषद, कृषी विभागाकडून प्रबोधनाची गरज

सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. ऊस तुटून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात उसाचा पाला (पाचट) शेतात शिल्लक राहतो. हे पाचट जाळून टाकण्यापेक्षा ते प्रत्येक सरीत अथवा एक सरी आड जर दाबून बसविले तर ते कुजून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय व गांडूळ खत निर्मितीला चालना मिळते, तर पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी होऊन पाण्याची बचत होते. त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेता येणे शक्य आहे. पाचट कुजविल्याने जमिनीची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो.पाचट जाळण्यापेक्षा ते सरीतच गाडल्यास लाखमोलाचे सेंद्रिय खत शेतातच निर्माण होते. त्यामुळे इतर खते देण्याचे प्रमाण कमी होऊन पैशांची बचत होते. उसाला अधिक पाणी देण्याकडे आपल्याकडील बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे; मात्र दिलेल्या एकूण पाण्यातील फक्त वीस टक्केच पाण्याचा पिकास उपयोग होतो. उर्वरित अधिकतर पाण्याचे बाष्पीभवन होते, हे अनेक शेतकऱ्यांना माहीतच नाही. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी जर पाचट सरीतच ठेवले तर उपलब्ध कमी पाण्यात चांगले उत्पन्न काढणे शक्य आहे. कारण पाचटामुळे जमीन झाकली गेल्याने पूर्वी दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे दहा दिवसांनी पाणी देण्याऐवजी पंधरा दिवसांनी दिले तरी चालते. यातूनच पाण्याची बचत होऊन ते पाणी इतर पिकांसाठी वापरता येणे शक्य आहे. पाचट न जाळल्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या हानीकारक कार्बनडायआॅक्साईड कमी होतो. पाचट शेतातच ठेवल्याने तणाचे प्रमाण कमी होते. यामुळे पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य मिळते. उत्पादन खर्चही कमी होऊन उत्पन्न वाढीला चालना मिळते. चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन शेती अधिकारी उमेश पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजविण्यासाठी लोकचळवळ उभी केली होती. अभियानांतर्गत जो शेतकरी चांगल्या पद्धतीने व जास्त क्षेत्रात पाचट राखून पाचट अभियानात भाग घेईल त्यांना विमान प्रवासाचे बक्षीस ठेवले होते. पण, पाटील यांच्या बदलीनंतर हे अभियान बंद झाले आहे. सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुन्हा पाचट अभियान राबवावे.पाचट अभियानाकडे शासनाचे दुर्लक्षपाचट जाळल्यास शेतातील तणकट जळते, पाचट ठेवल्याने उंदीर, साप मोठ्या प्रमाणात होतात, पाणी पाजण्यास अडथळा होतो, मशागतीस त्रास होतो अशा गैरसमजुतीतून शेतकरी पाचट राखण्याऐवजी जाळतात. त्यामुळे २०१२ मध्ये जि.प.चे तत्कालीन शेती अधिकारी उमेश पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ‘पाचट अभियान’ ही नवी संकल्पना घेऊन पाचट न पेटविता ते सरीतच दाबल्यास त्याचे खत तयार होते याबाबत प्रबोधन केले. त्यांच्या बदलीनंतर हे अभियान थांबले. कृषी विभागाने ते पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.आजही पाचट अभियान सुरू आहे. केंद्राकडून सॉईल हेल्थ मिशन अंतर्गत फार्म रेसिडयू मॅनेजमेंट हाती घेऊन आॅरगॅनिक कार्बन रिसाकल करून तो वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी रिंगटोनसुद्धा प्रसारित आहेत. पाचट कुजविल्यामुळे पाणी, खत, मशागत खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. - बसवराज मास्तोळी (आत्मा प्रकल्प) नैसर्गिक शेतीला गांडूळ खताची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतातच पाचट कुजविल्यास त्याचा फायदा होतो. पाचटामुळे भविष्यात खार फूट, नापीक जमीन होण्याचा धोका टळणार आहे. - सुभाष पाटील, कोपार्डे