शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

निवड प्रक्रियेवरून ताणाताणी

By admin | Updated: May 14, 2016 01:45 IST

महिला बालकल्याण समिती : न्यायालयाची मनाई असताना प्रक्रिया राबविल्याने संताप

कोल्हापूर : येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीस तूर्त मनाई केली असताना निवडणूक प्रक्रिया का आणि कशाच्या आधारावर राबवित आहात, असा जाब विचारत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांना शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. एवढेच नाही तर राजकीय दबावाखाली सुपारी घेऊन काम करत असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे महापालिकेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. महानगरपालिकेतील राजकीय सत्तासंघर्ष सध्या चांगलाच उफाळून आला आहे. जातीचे दाखले अवैध ठरविल्यामुळे महापौर, महिला बालकल्याण समिती सभापती याच्यासह सात नगरसेवकांना आपली पदे गमवावी लागली आहेत. विभागीय जातपडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू असतानाच महानगरपालिका प्रशासनाने घाईघाईने ‘स्थायी’चे दोन, ‘परिवहन’ व महिला बालकल्याण समितीचे प्रत्येक एक सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे, तसेच महिला बालकल्याण समिती सभापतिपदाची निवडणूक लावली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांना टार्गेट केले. शुक्रवारी सभापती निवडीला न्यायालयाने तूर्त मनाई केली. तो आदेश घेऊन दुपारी दोन वाजता कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण नगरसचिव कार्यालयात गेले. त्यांनी तो आदेश नगरसचिव उमेश रणदिवे यांच्याकडे दिला तसेच निवडणूक प्रक्रिया राबवू नका, अशी विनंती केली. त्यावेळी उमेश रणदिवे यांनी वकिलांचे मत नोंदवून घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. मनपा वकील डी. डी. घाडगे यांनी सभापती निवडणुकीस तूर्त मनाई केली असल्याने मंगळवारची निवड सभा तसेच सभेसमोरील विषय क्रमांक १ यावर निर्णय घेता येणार नाही. मात्र, निवडणूक प्रक्रिया राबविण्यास न्यायालयाने मनाई केलेली नाही, त्यामुळे आजपासून ही प्रक्रिया सुरू ठेवण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला. त्यामुळे नगरसचिवांनी दुपारी तीन वाजता सुरू होणारी ही प्रक्रिया दुपारी चार वाजता सुरू केली. त्याची माहिती मिळताच कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली. त्यामध्ये उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, राहुल माने, सूरमंजिरी लाटकर, तौफिक मुल्लाणी, आदींचा समावेश होता. या सर्वांनी रणदिवे यांना चांगलेच फैलावर घेतले. सभापती निवडीस मनाई असताना तुम्ही कोणत्या आधारावर प्रक्रिया राबवित आहात, अशी विचारणा सचिन चव्हाण व राजेश लाटकर यांनी केली. शारंगधर देशमुख यांनी तर रणदिवे यांच्यावर चांगल्याच फैरी झाडल्या. ‘उमेश रणदिवे मालक आहेत की देव आहेत. घाडगे वकिलांनी चुकीचा अभिप्राय दिला आहे. या प्रकरणात अधिकारी व वकील यांच्यात संगनमत झाले आहे. अधिकाऱ्यांनी शेण खाल्लंय. सुपारी घेऊन दबावाखाली काम करीत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. नगरसचिव कार्यालयातील वातावरण तापले असताना अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना तेथे बोलाविण्यात आले. त्यांनी न्यायालयाचा आदेश, मनपा वकिलांचा अभिप्राय वाचून बघितला. न्यायालयाने सभापती निवडणुकीस मनाई हुकूम केला असला तरी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात मनाई केलेली नाही. आम्ही सोमवारी या दाव्यात दाखल होत आहे, त्यावेळी न्यायालय काय निर्णय देईल ते पाहून प्रक्रिया थांबवायची की नाही हे ठरवू, असे देसाई यांनी सांगितले; परंतु त्यानेही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. कोणत्या आधारावर ही प्रक्रिया राबविता ते लेखी द्या, असा आग्रह त्यांनी धरला. ते मात्र नगरसचिवांनी दिले नाही म्हणून शारंगधर देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ही प्रक्रिया थांबवावी, अशी लेखी पत्र महापालिकेस देण्यात आले. त्यावर पोहोच घेण्यात आली. मनपाच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केला म्हणून तक्रार करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)