शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवड प्रक्रियेवरून ताणाताणी

By admin | Updated: May 14, 2016 01:45 IST

महिला बालकल्याण समिती : न्यायालयाची मनाई असताना प्रक्रिया राबविल्याने संताप

कोल्हापूर : येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीस तूर्त मनाई केली असताना निवडणूक प्रक्रिया का आणि कशाच्या आधारावर राबवित आहात, असा जाब विचारत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांना शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. एवढेच नाही तर राजकीय दबावाखाली सुपारी घेऊन काम करत असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे महापालिकेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. महानगरपालिकेतील राजकीय सत्तासंघर्ष सध्या चांगलाच उफाळून आला आहे. जातीचे दाखले अवैध ठरविल्यामुळे महापौर, महिला बालकल्याण समिती सभापती याच्यासह सात नगरसेवकांना आपली पदे गमवावी लागली आहेत. विभागीय जातपडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू असतानाच महानगरपालिका प्रशासनाने घाईघाईने ‘स्थायी’चे दोन, ‘परिवहन’ व महिला बालकल्याण समितीचे प्रत्येक एक सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे, तसेच महिला बालकल्याण समिती सभापतिपदाची निवडणूक लावली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांना टार्गेट केले. शुक्रवारी सभापती निवडीला न्यायालयाने तूर्त मनाई केली. तो आदेश घेऊन दुपारी दोन वाजता कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण नगरसचिव कार्यालयात गेले. त्यांनी तो आदेश नगरसचिव उमेश रणदिवे यांच्याकडे दिला तसेच निवडणूक प्रक्रिया राबवू नका, अशी विनंती केली. त्यावेळी उमेश रणदिवे यांनी वकिलांचे मत नोंदवून घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. मनपा वकील डी. डी. घाडगे यांनी सभापती निवडणुकीस तूर्त मनाई केली असल्याने मंगळवारची निवड सभा तसेच सभेसमोरील विषय क्रमांक १ यावर निर्णय घेता येणार नाही. मात्र, निवडणूक प्रक्रिया राबविण्यास न्यायालयाने मनाई केलेली नाही, त्यामुळे आजपासून ही प्रक्रिया सुरू ठेवण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला. त्यामुळे नगरसचिवांनी दुपारी तीन वाजता सुरू होणारी ही प्रक्रिया दुपारी चार वाजता सुरू केली. त्याची माहिती मिळताच कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली. त्यामध्ये उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, राहुल माने, सूरमंजिरी लाटकर, तौफिक मुल्लाणी, आदींचा समावेश होता. या सर्वांनी रणदिवे यांना चांगलेच फैलावर घेतले. सभापती निवडीस मनाई असताना तुम्ही कोणत्या आधारावर प्रक्रिया राबवित आहात, अशी विचारणा सचिन चव्हाण व राजेश लाटकर यांनी केली. शारंगधर देशमुख यांनी तर रणदिवे यांच्यावर चांगल्याच फैरी झाडल्या. ‘उमेश रणदिवे मालक आहेत की देव आहेत. घाडगे वकिलांनी चुकीचा अभिप्राय दिला आहे. या प्रकरणात अधिकारी व वकील यांच्यात संगनमत झाले आहे. अधिकाऱ्यांनी शेण खाल्लंय. सुपारी घेऊन दबावाखाली काम करीत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. नगरसचिव कार्यालयातील वातावरण तापले असताना अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना तेथे बोलाविण्यात आले. त्यांनी न्यायालयाचा आदेश, मनपा वकिलांचा अभिप्राय वाचून बघितला. न्यायालयाने सभापती निवडणुकीस मनाई हुकूम केला असला तरी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात मनाई केलेली नाही. आम्ही सोमवारी या दाव्यात दाखल होत आहे, त्यावेळी न्यायालय काय निर्णय देईल ते पाहून प्रक्रिया थांबवायची की नाही हे ठरवू, असे देसाई यांनी सांगितले; परंतु त्यानेही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. कोणत्या आधारावर ही प्रक्रिया राबविता ते लेखी द्या, असा आग्रह त्यांनी धरला. ते मात्र नगरसचिवांनी दिले नाही म्हणून शारंगधर देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ही प्रक्रिया थांबवावी, अशी लेखी पत्र महापालिकेस देण्यात आले. त्यावर पोहोच घेण्यात आली. मनपाच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केला म्हणून तक्रार करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)