शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

स्वनिधी स्वच्छता अभियानासाठी

By admin | Updated: November 25, 2014 23:49 IST

परशराम तावरेंंचा पुढाकार : अकरा लाखांतून घमेली, खोरे, मास्क खरेदी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतून मिळणारा ११ लाखांचा स्वनिधी हा वैयक्तिक कामांसाठी न घेता तो स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय जिल्हा परिषद सदस्य परशराम तावरे यांनी घेतला आहे. त्यांनी त्याबाबतचे लेखी पत्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या संपूर्ण भारत स्वच्छता अभियानासाठी स्वत:चा निधी खर्च करणारा राज्यातील एकमेव जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज तावरेंकडे पाहिले जाते.पंतप्रधान मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण भारत स्वच्छता अभियान सुरू केले आहे. गावपातळीवर, शासकीय कार्यालय, आदी ठिकाणी व्यक्ती, संस्था, शाळा, महाविद्यालयीन युवक, लोकप्रतिनिधी, आदी सर्वजण या अभियानात स्वच्छतेचे काम करीत आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जिल्हा परिषद सदस्य तावरे यांनी स्वत:चा स्वनिधी ११ लाख रुपये अभियानासाठी खर्च करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनास कळविले आहे. त्या निधीतून घमेली तीन हजार १८०, खोरे तीन हजार १८०, चेहऱ्यास लावायचे मास्क २५ हजार, हातमोजे ५० हजार, दांडा झाडू तीन हजार १८०, असे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. हे साहित्य जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांना दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेत निधी मंजूर करण्यासाठी अनेक सदस्यांच्यात चढाओढ असते. परंतु, तावरे यांनी स्वत:चा स्वनिधी स्वच्छता अभियानासाठी खर्च करण्याचे धाडस दाखवून समाजामध्ये वेगळा आदर्श रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या आदर्श कामगिरीचे जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांतून कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)