शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीची आजपासून मिस कॉल मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

कोल्हापूर : निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून एफआरपी तीन तुकड्यांत देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आज, रविवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ...

कोल्हापूर : निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून एफआरपी तीन तुकड्यांत देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आज, रविवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यभर मिसकॉल मोहीम सुरू होत आहे. स्वत: शेट्टी यांच्या नावाने घेतलेल्या फोन क्रमांकावरच या महिनाअखेरपर्यंत हे कॉल देऊन न्यायालयात खेचण्यासाठी माहितीचे संकलन सुरू होत आहे. ८४४८१८३७५१ या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाच निती आयोग व कृषी मूल्य आयोगाने एफआरपी ६०:२०:२० अशा तीन टप्प्यांत देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. राज्य सरकारनेही टास्क फोर्सकडे यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही शिफारस असल्याने शेट्टी यांनी यावर एकाच वेळी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाईची घोषणा केली आहे. थकीत एफआरपीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल केलेली आहे. तेथेच संसदेची मान्यता नसतानाही एफआरपीची मोडतोड केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. त्यासाठी पुरावा म्हणून एफआरपी मोडतोडीला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे असणे आवश्यक आहे. म्हणून संघटनेने १२ ते ३० सप्टेंबर अशी २० दिवसांची मिसकॉल मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात आज होत आहे.

मिस कॉल देणे म्हणजे एकरकमी एफआरपी मान्य असलेले, तर तीन टप्प्यांत एफआरपी नाकारणारे शेतकरी ठरणार आहेत. यातून तयार होणारी माहिती पुरावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.