शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज जलसमाधी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST

कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा आज रविवारी नृसिंहवाडीत दाखल होणार असून, संघटनेचे नेते राजू शेट्टी व संघटनेच्या ...

कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा आज रविवारी नृसिंहवाडीत दाखल होणार असून, संघटनेचे नेते राजू शेट्टी व संघटनेच्या एकाही कार्यकर्त्याला नृसिंहवाडीत अथवा नदीक्षेत्र परिसरात प्रवेश करता येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चारशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नृसिंवाडीत प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रयाग चिखली येथून गेल्या चार दिवसांपासून जलसमाधी परिक्रमा सुरू आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ घोषणा केली असून, त्याचा शासकीय आदेश काढावा अन्यथा कोणत्याही परिस्थितीत हजारो शेतकऱ्यांसह कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. शिवाय जलसमाधी आंदोलनात कार्यकर्त्यांसह शेतकरी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे.

हेरवाड (ता. शिरोळ) येथून जलसमाधीसाठी कुरुंदवाडमार्गे नृसिंहवाडी येथील कृष्णा नदीच्या दिशेने आंदोलक जाणार आहेत. मात्र, मार्गावर पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जलपरिक्रमा मोर्चा अडवण्यासाठी कुरुंदवाड येथे शिवतीर्थ रस्त्यावरच बॅरिकेड्स लावण्यात येणार आहे.

तसेच शिरोळ रस्ता, शिरटी जुना रस्ता, औरवाड या मार्गावर बॅरिकेड्स लावून रस्ता पूर्ण बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आले आहेत.