शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

स्वाभिमानी संघटना ‘ताराराणी’सोबत

By admin | Updated: August 9, 2015 01:45 IST

आज निर्णय : तीन जागांची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ताराराणी आघाडीसोबत यावे, या संदर्भातील चर्चा खासदार राजू शेट्टी व ताराराणी आघाडीच्या संयोजकांमध्ये शनिवारी जयसिंगपूर येथे झाली. चर्चा सकारात्मक झाली असून, आम्ही तीन जागांची मागणी केली आहे. आज, रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यक्षेत्र शहरात फारसे नसले तरी कदमवाडी, भोसलेवाडी, महाडिक वसाहत, फुलेवाडी, आदी ग्रामीण वस्ती असलेल्या भागात संघटनेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपने पुढाकार घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपब्लिकन पक्षाला एकत्र करून महायुती केली होती. तसाच प्रयत्न महापालिकेच्या निवडणुकीतही भाजप व ताराराणी आघाडीचा आहे. त्याच घडामोडीचा भाग म्हणून शनिवारी ताराराणी आघाडीचे संयोजक सुहास लटोरे, सुनील कदम, आदींनी जयसिंगपूर येथे जाऊन खासदार राजू शेट्टी, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीत सामील होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. किती जागा लढवायच्या या संदर्भात चर्चा अपूर्ण असून आज, रविवारी यावर तोडगा निघण्याची शक्याता आहे.