शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजाराबाबत संशयाची सुई राजू शेट्टींकडेच

By admin | Updated: January 18, 2016 00:57 IST

हसन मुश्रीफ यांचा प्रत्यारोप : शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’

कोल्हापूर : साखरेचे दर वाढत असताना वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना घाबरवून दर पाडण्याचा प्रयत्न खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने साठेबाजाराबाबत निर्माण झालेली संशयाची सुई त्यांच्याकडे झुकत असल्याचा प्रत्यारोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. चौकशीचा घाव मुश्रीफांच्या वर्मी बसला नसून शेट्टी यांना सत्य काय आहे, हे समजल्यामुळेच त्यांचा त्रागा सुरू आहे. शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ असल्याची टीकाही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली. वायदेबाजारातील साखरविक्रीच्या चौकशीची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने आमदार हसन मुश्रीफ व त्यांच्यामध्ये गेले चार दिवस वार-पलटवार सुरू आहेत. आमदार मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर वाढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. अशावेळी व्यापाऱ्यांवर धाडी टाकून वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना भीती दाखविली जात आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्यावर मर्यादा आल्या असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आपण एक साधे ऊस उत्पादक शेतकरी आहोत. तथाकथित शेतकरी नेता नाही. आपले सटोडिया, साखर व्यापारी अगर खासगी कॉर्पोरेट साखर कारखानदार यांच्याशी संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. आपले एकच म्हणणे आहे, साखरेच्या मोठ्या व्यापाऱ्यांनी हजारो कोटी फ्युचर ट्रेडिंगमध्ये कमी दराने साखर विकली होती. आता साखरेचे दर वाढल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते नुकसान थांबवायचे असल्यास साखरेचे दर कमी करणे एवढाच मार्ग होता. त्यासाठी अशा व्यापाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींचा वापर करण्यात आला. असे व्यापारी व शेतकऱ्यांचे कर्दनकाळ जे नेते आहेत, त्यांचे संबंध काय आहेत? त्यांचे फोनवरून काय-काय बोलणे झाले, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कोणाची मिलीभगत आहे, हे सत्य शेतकऱ्यांसमोर आलेच पाहिजे, अशी मागणीही आमदार मुश्रीफ यांनी केली. साखरेचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने एफआरपी देताना दमछाक झाली. त्यावेळी शेट्टी यांनी साठेबाजाराविरोधात तक्रारी का केल्या नाहीत? साखरेचे दर वाढत असतानाच तक्रारीचे कारण काय? हे पाहिले तर वायदेबाजाराबाबत संशयाची सुई खासदार राजू शेट्टी यांच्याकडेच जाते. नेहमीप्रमाणे दुसऱ्याचे नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले पाहिजे, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली.