शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजाराबाबत संशयाची सुई राजू शेट्टींकडेच

By admin | Updated: January 18, 2016 00:57 IST

हसन मुश्रीफ यांचा प्रत्यारोप : शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’

कोल्हापूर : साखरेचे दर वाढत असताना वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना घाबरवून दर पाडण्याचा प्रयत्न खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने साठेबाजाराबाबत निर्माण झालेली संशयाची सुई त्यांच्याकडे झुकत असल्याचा प्रत्यारोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. चौकशीचा घाव मुश्रीफांच्या वर्मी बसला नसून शेट्टी यांना सत्य काय आहे, हे समजल्यामुळेच त्यांचा त्रागा सुरू आहे. शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ असल्याची टीकाही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली. वायदेबाजारातील साखरविक्रीच्या चौकशीची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने आमदार हसन मुश्रीफ व त्यांच्यामध्ये गेले चार दिवस वार-पलटवार सुरू आहेत. आमदार मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर वाढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. अशावेळी व्यापाऱ्यांवर धाडी टाकून वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना भीती दाखविली जात आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्यावर मर्यादा आल्या असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आपण एक साधे ऊस उत्पादक शेतकरी आहोत. तथाकथित शेतकरी नेता नाही. आपले सटोडिया, साखर व्यापारी अगर खासगी कॉर्पोरेट साखर कारखानदार यांच्याशी संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. आपले एकच म्हणणे आहे, साखरेच्या मोठ्या व्यापाऱ्यांनी हजारो कोटी फ्युचर ट्रेडिंगमध्ये कमी दराने साखर विकली होती. आता साखरेचे दर वाढल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते नुकसान थांबवायचे असल्यास साखरेचे दर कमी करणे एवढाच मार्ग होता. त्यासाठी अशा व्यापाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींचा वापर करण्यात आला. असे व्यापारी व शेतकऱ्यांचे कर्दनकाळ जे नेते आहेत, त्यांचे संबंध काय आहेत? त्यांचे फोनवरून काय-काय बोलणे झाले, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कोणाची मिलीभगत आहे, हे सत्य शेतकऱ्यांसमोर आलेच पाहिजे, अशी मागणीही आमदार मुश्रीफ यांनी केली. साखरेचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने एफआरपी देताना दमछाक झाली. त्यावेळी शेट्टी यांनी साठेबाजाराविरोधात तक्रारी का केल्या नाहीत? साखरेचे दर वाढत असतानाच तक्रारीचे कारण काय? हे पाहिले तर वायदेबाजाराबाबत संशयाची सुई खासदार राजू शेट्टी यांच्याकडेच जाते. नेहमीप्रमाणे दुसऱ्याचे नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले पाहिजे, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली.