शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

साठेबाजाराबाबत संशयाची सुई राजू शेट्टींकडेच

By admin | Updated: January 18, 2016 00:57 IST

हसन मुश्रीफ यांचा प्रत्यारोप : शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’

कोल्हापूर : साखरेचे दर वाढत असताना वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना घाबरवून दर पाडण्याचा प्रयत्न खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने साठेबाजाराबाबत निर्माण झालेली संशयाची सुई त्यांच्याकडे झुकत असल्याचा प्रत्यारोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. चौकशीचा घाव मुश्रीफांच्या वर्मी बसला नसून शेट्टी यांना सत्य काय आहे, हे समजल्यामुळेच त्यांचा त्रागा सुरू आहे. शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ असल्याची टीकाही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली. वायदेबाजारातील साखरविक्रीच्या चौकशीची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने आमदार हसन मुश्रीफ व त्यांच्यामध्ये गेले चार दिवस वार-पलटवार सुरू आहेत. आमदार मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर वाढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. अशावेळी व्यापाऱ्यांवर धाडी टाकून वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना भीती दाखविली जात आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्यावर मर्यादा आल्या असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आपण एक साधे ऊस उत्पादक शेतकरी आहोत. तथाकथित शेतकरी नेता नाही. आपले सटोडिया, साखर व्यापारी अगर खासगी कॉर्पोरेट साखर कारखानदार यांच्याशी संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. आपले एकच म्हणणे आहे, साखरेच्या मोठ्या व्यापाऱ्यांनी हजारो कोटी फ्युचर ट्रेडिंगमध्ये कमी दराने साखर विकली होती. आता साखरेचे दर वाढल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते नुकसान थांबवायचे असल्यास साखरेचे दर कमी करणे एवढाच मार्ग होता. त्यासाठी अशा व्यापाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींचा वापर करण्यात आला. असे व्यापारी व शेतकऱ्यांचे कर्दनकाळ जे नेते आहेत, त्यांचे संबंध काय आहेत? त्यांचे फोनवरून काय-काय बोलणे झाले, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कोणाची मिलीभगत आहे, हे सत्य शेतकऱ्यांसमोर आलेच पाहिजे, अशी मागणीही आमदार मुश्रीफ यांनी केली. साखरेचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने एफआरपी देताना दमछाक झाली. त्यावेळी शेट्टी यांनी साठेबाजाराविरोधात तक्रारी का केल्या नाहीत? साखरेचे दर वाढत असतानाच तक्रारीचे कारण काय? हे पाहिले तर वायदेबाजाराबाबत संशयाची सुई खासदार राजू शेट्टी यांच्याकडेच जाते. नेहमीप्रमाणे दुसऱ्याचे नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले पाहिजे, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली.