शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

संशयित प्रीतमच्या घरावर हल्ला

By admin | Updated: March 4, 2017 01:15 IST

प्रापंचिक साहित्याची तोडफोड : कार्यकर्ते संतप्त, परिसरात तणाव, बंदोबस्त

कोल्हापूर : महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या झाल्याचे समजताच सुमारे चारशेपेक्षा जास्त आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी गर्दी केली. संशयित प्रीतम पाटील याचे घर शेजारीच आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी त्याच्या घरावर दगडफेक करत प्रापंचिक साहित्यासह कारची तोडफोड केली. यावेळी प्रीतमची आई, पत्नी व लहान मुलाला जीव मुठीत घेऊन पळावे लागले. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला. डॉ. किरवले यांचा हत्या कोणत्या कारणातून झाला हे लवकर स्पष्ट न झाल्याने कार्यकर्ते भांबावून गेले. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी किरवले यांच्या बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आत कोणालाच सोडले नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांची भेट घेऊन माहिती घेतली असता शेजारीच राहणाऱ्या प्रीतम गणपती पाटील याने पैशांच्या वादातून हत्या केल्याचे सांगण्यात आले. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी रक्ताचे नमुने घेतले. शहरातील चारही पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलतांना पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांनी डॉ. कृष्णा किरवले यांचा खून वैयक्तिक कारणातून झाल्याचे पुढे येत आहे. त्यामध्ये सामाजिक हेतू दिसत नसला तरी सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर दलित कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन ‘सामाजिक हेतू दिसत नाही, असे तुम्ही बोलताच कसे,’ म्हणून त्यांच्याशी वाद घालत घेराओ घातला. सुमारे अर्धा तास पोद्दार यांना अडवून ठेवले. अखेर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. डॉ. किरवले यांच्या हत्यामागचे सर्व पैलू तपासले जातील. त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपविण्यात आला आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य केल्यास योग्य दिशेने तपास करू, असा विश्वास देऊन कार्यकर्त्यांना शांत केले. दरम्यान, संशयीत पाटील याचे घर किरवले यांच्या घराशेजारीच आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी त्याच्या घरावर दगडफेक करत प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. यावेळी घरामध्ये आरोपीची आई, पत्नी व लहान मुल होते. या तिघांनाही जीव मुठीत घेऊन बाहेर पळावे लागले. त्यानंतर पोलिसांनी घरासभोवती पोलिस बंदोबस्त ठेवला. (प्रतिनिधी)+संशयिताकडून वसुलीचे कामसंशयित प्रीतम पाटील हा वडिलांना सुतारकामात मदत करत असे. राजेंद्रनगर परिसरातील तरुणांच्यात त्याची नेहमी ऊठबस असायची. वडिलांनी केलेल्या कामाची तो वसुली करत असे. डॉ. किरवले यांच्याकडे त्याने पैशांसाठी तगादा लावला होता. ते पैसे देत नाहीत, याची खात्री झाल्यानंतर त्याने खुन केला.