शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कथाकथनातून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रत्यय संस्थेच्यावतीने रविवारी सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ‘इडा पीडा टळो’ हा शेतकरी आंदोलनावरील ऑनलाईन कार्यक्रम झाला. ज्येष्ठ ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रत्यय संस्थेच्यावतीने रविवारी सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ‘इडा पीडा टळो’ हा शेतकरी आंदोलनावरील ऑनलाईन कार्यक्रम झाला. ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या कथेचे अभिवाचन व गाण्यांचे सादरीकरण करीत दिल्लीतील आंदोलनाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला.

अन्नदाता शेतकरी देशाच्या राजधानीचे दार ठोठावत त्याचे गाऱ्हाण सांगायला उभा आहे. त्यांना आत घेऊन त्याला पाणी आणि गुळाचा खडा देण्याऐवजी हे सरकार या धरतीच्या लेकरांवर थंडगार पाण्याचे फवारे मारत आहे. तो आत येऊ नये म्हणून रस्ते खणून ठेवत आहे. रस्त्यांवर खिळे ठोकून प्रचंड मोठाली बॅरिकेड्स उभे करीत आहे. ‘इडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो’ असे म्हणणारी आपली संस्कृती, पण हे सरकार या बळीलाच गाडायला निघाले आहे. मंडळी, जागे होऊया, आपल्या भविष्यासाठी, आपल्या पोरांच्या भविष्यासाठी, अन्नदात्याच्या अस्तित्वासाठी जागे होऊया!, असा संदेश या कार्यक्रमातून संयोजकांनी दिला.

यावेळी आदित्य खेबुडकर, नीरज नारकर, संजय पाटील, आसावरी नागवेकर, रसिया पडळकर, स्वरा कलश, रणजित कांबळे या कलाकारांनी कथांचे सादरीकरण केले. नामदेव हसुरकर, गौतम कांबळे यांची त्यांना साथ मिळाली. रंगमंच व्यवस्था व चलचित्रण सुहास लकडे, संदेश सामंत, दीपिका पुरी यांनी केले. सिद्धी मिरजे, शेखर गुरव यांनी संकलन, तर निखिल कुलकर्णी यांनी कला रचना केली.