शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पुरवठा विभागातील गैरकारभाराने सामान्य त्रस्त

By admin | Updated: November 17, 2014 00:24 IST

गगनबावडा तालुका : भ्रष्ट यंत्रणेचा फटका, वंचित आता आंदोलनाच्या पावित्र्यात

चंद्रकांत पाटील - गगनबावडा -रेशनकार्डअभावी केंद्रशासनाच्या अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना यापासून गगनबावडा तालुक्यातील अनेक नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. तसेच रुग्णांना उपचाराअभावी आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे भ्रष्ट यंत्रणेचा फटका नागरिकांना बसत असून, या योजनेपासून वंचित राहणारे आता तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.पुरवठा विभागाच्या मनधरणीसाठी रेशन दुकानदार गैरमार्गाचा अवलंब करीत आहेत. याबाबत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अनागोंदी कारभार अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. अन्नसुरक्षा योजनेतून स्वस्त धान्य सामान्य लोकांना देऊन त्यांची भूक क्षमविण्यासाठी केंद्रशासनाने महत्त्वाकांक्षी अशी योजना हाती घेतली. ही योजना राबविताना दुसरीकडे मात्र रेशन दुकानात आलेले धान्य चढ्या दराने काळ्या बाजारात विकले जात आहे. रेशन दुकानापासून तालुकास्तरापर्यंत व तेथून जिल्हा स्तरापर्यंत पुरवठा विभागाची भ्रष्ट साखळी तयार झाली आहे. सार्वजनिक वितरण यंत्रणेत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश येत आहे. उलट रेशन दुकानदारांचा राजकीय व्यवस्थेसाठी कसा वापर करून घेता येईल, यासाठी काहीजण गैरवापर करीत आहेत. दुकानदारांच्या मागे अधिकारी पैशांच्या मागणीचा ससेमिरा लावत गरिबांच्या हक्काच्या योजनेवर घाला घालण्याचे काम होत आहे. घाऊक व अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्या परवानाधारकांना रॉकेलचा कोटा किती वाटप झाला, किती शिल्लक आहे याची तपासणी का होत नाही? यामागे राजकारण व भ्रष्टाचार हेच प्रमुख कारण आहे. याशिवाय मध्यमवर्गीय आणि त्यावरच्या नागरिकांना रेशन दुकानांशी देणे-घेणे नाही. याचा फायदा घेऊन रेशन दुकानदार त्याचा काळाबाजार करीत आहेत. ४केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण यंत्रणेद्वारे गरीब आणि गरजू सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात अन्नपुरवठा व्हावा, ही अपेक्षा फोल ठरली आहे.४काळ्या बाजारात गहू, रॉकेल विक्री होत असल्याच्या घटना घडूनही याबाबत वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील धान्य, रॉकेल काळ्या बाजारात विक्रीस जात असताना त्यावर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.४सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेत भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वेळीच कारवाई होणे अपेक्षित आहे. पुरवठा विभाग रेशन दुकानदारांना अपुरा धान्यपुरवठा करते, अशी ओरड दुकानदार करीत आहेत.