शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

४८ हजार वीज पंपांचा पुरवठा अजूनही खंडितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : महापुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ६२ टक्के कृषिपंपांचा वीज पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. महिन्याभरात बाधित ७७ हजारपैकी ...

कोल्हापूर : महापुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ६२ टक्के कृषिपंपांचा वीज पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. महिन्याभरात बाधित ७७ हजारपैकी केवळ २९ हजार कनेक्शन पूर्ववत झाले असून, अजूनही ४८ हजार पंप जाेडणी नसल्यामुळे सुरूच होऊ शकलेले नाही. नद्या, विहिरी तुडुंब भरल्या आहेत; पण पिकांना पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या कडक उन्हामुळे पिकांची पाण्याची गरज वाढली असताना केवळ वीज जोडणी पूर्ववत न झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात कोल्हापुरात २०१९ प्रमाणेच मोठा महापूर आला. यात जिल्ह्यात विजेचे खांब पडल्याने, टीसी, तारा तुटल्यामुळे ३ लाख ४० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या ग्राहकांचा प्राधान्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची यंत्रणा महावितरणने लावली. यातील २ लाख ६२ हजार वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन वेगाने पूर्वपदावर आले. मात्र, याचवेळी कृषीकडे मात्र कांहीसे दुर्लक्ष झाले. नदीकाठावर जाण्यासाठी मार्ग नाही, दलदल आहे, साहित्य शिल्लक नाही असे सांगत या जोडण्या लांबवीत नेल्या. दरम्यान, पावसानेही मोठा खंड दिला. सुरुवातीला बरा वाटणारा हा खंड जसे दिवस पुढे सरकतील तसे नको वाटू लागले. गेल्या चार दिवसांपासून तर कडक ऊन पडत असल्याने तर जमिनी भेगाळू लागल्या आहेत. पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी पिकांना पाणी द्यायचे तर वीज पुरवठाच जोडलेला नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

जिल्ह्यात ७७ हजार कृषिपंपांचे वीज कनेक्शन बाधित झाले होते. त्यातील २९ हजार कनेक्शनची जोडणी पूर्ववत केली असून, तेथेे पाणीपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण, एकूण जोडणी दिलेल्या कनेक्शनपैकी जोडणी नसलेल्या कनेक्शनची संख्या ४८ हजार इतकी आहे.

प्रतिक्रिया

महापुरामुळे नादुरुस्त रोहित्रे बदलून नवीन राेहित्रे, खांब, तारा यांची वाहतूक करणे अशक्य होते. त्यामुळे कृषिपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागत आहे. आता पाण्याची वाढलेली गरज पाहता, संपूर्ण यंत्रणा या कामासाठीच वापरली जात आहे.

परेश भागवत, मुख्य अभियंता, महावितरण