शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील पूरबातमीसाठी पूरक बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

महापुराचा परिणाम पाहता कोल्हापूरची हद्दवाढ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते ...

महापुराचा परिणाम पाहता कोल्हापूरची हद्दवाढ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कोल्हापूर महापालिका सक्षमपणे चालण्यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. प्राधिकरण तयार केले आहे. मात्र, त्याला काही अधिकार नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी घातलेले भराव ही आता एक समस्या झाली आहे. आर्किटेक्चरनीच त्याचे उत्तर शोधावे. पुलाचे बांधकाम कमानींचे असावे की कसे असावे याचाही फेरविचार करायची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नद्यांमधील गाळ आणि वाळू न काढण्याबाबत काढलेला आदेश रद्द करण्याची गरज आहे. नद्या उथळ झाल्या आहेत. नदी, नाल्यांची पात्रे रुंद आणि खोल करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शहरांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे तेथेही नियोजन करण्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.

धाडसी निर्णयाचा फायदा झाला

सतेज पाटील

२०१९ च्या पुराच्यावेळी जिल्ह्यातील प्रशासनाची काय तयारी होती या वादात मी जाणार नाही; परंतु यावेळी आम्ही जे नियोजन केले, त्याला यश आले. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक धरणे रिकामी करण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो; परंतु यामुळे पुराची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. २००५ च्या पुरात पुरातील गावांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रस्ते नव्हते. त्यासाठी आम्ही रस्ते केले आणि याच रस्त्यांच्या भरावामुळे पूरस्थिती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे नव्याने उपाययोजना कराव्या लागतील. भराव्या ठिकाणचे रस्ते उचलून घ्यायचे, रस्त्यातून डक्टमधून पाणी काढायचं अशी पंचगंगेच्या ६७ किलोमीटरच्या प्रवासात सगळीकडेच दक्षता घ्यावी लागणार आहे. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ओढे, नाले रुंद करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

आपण कमी पडलोय ही वस्तुस्थिती

आमदार चंद्रकांत जाधव

शहर विकासामध्ये आपण सर्वजण कमी पडलोय हे मान्य करूया. जिथं शक्यताही नाही तिथं पूर आल्यामुळे फेरविचाराची गरज आहे. त्यामुळे यापुढे पाणलोट क्षेत्रात बांधकाम करणे टाळायला हवे. महापालिका, अधिकारी, बिल्डर या साऱ्यांनाच कामाची दिशा बदलावी लागेल. आपल्याकडे आधी घर आणि नंतर ड्रेनेजलाईन टाकली जाते. त्याच्या उलट झाले पाहिजे. आयुष्याच्या कमाईतून घर घेतलेल्यांना नाहक त्रास होऊ नये याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.

पिलर पूल उभारावे लागतील

अजय कोराणे

या महापुराच्या आधीच आम्ही असोसिएशनच्यावतीने निवेदन दिले होते. पर्जन्यवृष्टीतील बदल, ढगफुटी, अतिक्रमणे, वाढती बांधकामे या सर्व बाबींचा विचार करण्याची गरज आम्ही निवेदनातून व्यक्त केली होती. पावसाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा अधिक विकसित करावी लागेल. शिरोली महामार्ग, कसबा बावडा रोड, शिवाजी पुलाच्या पुढील रेडेडोह रस्ता या ठिकाणी पाण्याचा निचरा करणारे पिलरवरील पूल उभारण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी न थांबता पुढे जाईल अशी बांधकाम रचना या ठिकाणी आवश्यक आहे. येणाऱ्या तिसऱ्या विकास आराखड्यामध्ये ६६ किलोमीटरच्या क्षेत्रात सध्या ६९ टक्के क्षेत्र विकसित आहे. उर्वरित ठिकाणी मात्र नव्या नियमांची अंमलबजावणी व्हावी, तसेच कोल्हापूरच्या हद्दवाढीशिवाय दुसरा कोणताही उपाय आता दिसत आहे.