शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
4
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
5
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
6
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
7
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
8
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
9
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
10
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
11
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
12
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
13
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
14
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
15
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
16
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
17
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
18
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
19
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
20
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

जयंत पाटील पूरबातमीसाठी पूरक बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

महापुराचा परिणाम पाहता कोल्हापूरची हद्दवाढ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते ...

महापुराचा परिणाम पाहता कोल्हापूरची हद्दवाढ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कोल्हापूर महापालिका सक्षमपणे चालण्यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. प्राधिकरण तयार केले आहे. मात्र, त्याला काही अधिकार नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी घातलेले भराव ही आता एक समस्या झाली आहे. आर्किटेक्चरनीच त्याचे उत्तर शोधावे. पुलाचे बांधकाम कमानींचे असावे की कसे असावे याचाही फेरविचार करायची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नद्यांमधील गाळ आणि वाळू न काढण्याबाबत काढलेला आदेश रद्द करण्याची गरज आहे. नद्या उथळ झाल्या आहेत. नदी, नाल्यांची पात्रे रुंद आणि खोल करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शहरांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे तेथेही नियोजन करण्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.

धाडसी निर्णयाचा फायदा झाला

सतेज पाटील

२०१९ च्या पुराच्यावेळी जिल्ह्यातील प्रशासनाची काय तयारी होती या वादात मी जाणार नाही; परंतु यावेळी आम्ही जे नियोजन केले, त्याला यश आले. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक धरणे रिकामी करण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो; परंतु यामुळे पुराची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. २००५ च्या पुरात पुरातील गावांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रस्ते नव्हते. त्यासाठी आम्ही रस्ते केले आणि याच रस्त्यांच्या भरावामुळे पूरस्थिती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे नव्याने उपाययोजना कराव्या लागतील. भराव्या ठिकाणचे रस्ते उचलून घ्यायचे, रस्त्यातून डक्टमधून पाणी काढायचं अशी पंचगंगेच्या ६७ किलोमीटरच्या प्रवासात सगळीकडेच दक्षता घ्यावी लागणार आहे. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ओढे, नाले रुंद करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

आपण कमी पडलोय ही वस्तुस्थिती

आमदार चंद्रकांत जाधव

शहर विकासामध्ये आपण सर्वजण कमी पडलोय हे मान्य करूया. जिथं शक्यताही नाही तिथं पूर आल्यामुळे फेरविचाराची गरज आहे. त्यामुळे यापुढे पाणलोट क्षेत्रात बांधकाम करणे टाळायला हवे. महापालिका, अधिकारी, बिल्डर या साऱ्यांनाच कामाची दिशा बदलावी लागेल. आपल्याकडे आधी घर आणि नंतर ड्रेनेजलाईन टाकली जाते. त्याच्या उलट झाले पाहिजे. आयुष्याच्या कमाईतून घर घेतलेल्यांना नाहक त्रास होऊ नये याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.

पिलर पूल उभारावे लागतील

अजय कोराणे

या महापुराच्या आधीच आम्ही असोसिएशनच्यावतीने निवेदन दिले होते. पर्जन्यवृष्टीतील बदल, ढगफुटी, अतिक्रमणे, वाढती बांधकामे या सर्व बाबींचा विचार करण्याची गरज आम्ही निवेदनातून व्यक्त केली होती. पावसाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा अधिक विकसित करावी लागेल. शिरोली महामार्ग, कसबा बावडा रोड, शिवाजी पुलाच्या पुढील रेडेडोह रस्ता या ठिकाणी पाण्याचा निचरा करणारे पिलरवरील पूल उभारण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी न थांबता पुढे जाईल अशी बांधकाम रचना या ठिकाणी आवश्यक आहे. येणाऱ्या तिसऱ्या विकास आराखड्यामध्ये ६६ किलोमीटरच्या क्षेत्रात सध्या ६९ टक्के क्षेत्र विकसित आहे. उर्वरित ठिकाणी मात्र नव्या नियमांची अंमलबजावणी व्हावी, तसेच कोल्हापूरच्या हद्दवाढीशिवाय दुसरा कोणताही उपाय आता दिसत आहे.