शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सुमंत यांनी वैचारिक बहुजनवाद रुजविला

By admin | Updated: April 15, 2015 23:59 IST

अशोक चौसाळकर : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे झाली शोकसभा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वैचारिक क्षेत्रात बहुजनवाद रुजविण्याचे काम डॉ. यशवंत सुमंत यांनी केले. त्यांचा बहुजनवाद हा महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांच्या समन्वयातून निर्माण झाला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी बुधवारी येथे केले.पुरोगामी विचारवंत डॉ. यशवंत सुमंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित शोकसभेत ते बोलत होते. बिंदू चौकातील रेड फ्लॅग बिल्डिंगमधील या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास रणसुभे होते.डॉ. चौसाळकर म्हणाले, डॉ. सुमंत यांनी महाराष्ट्राला महात्मा गांधीजींची ओळख ‘बहुजनवादी गांधी’ म्हणून करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म समजावून सांगताना त्यांनी जातींवर आधारित संघटना टिकणार नाहीत, हे आंबेडकर यांचे विचार पुराव्याने मांडले. शिवाय त्यांनी गांधीवाद्यांना आंबेडकरवाद, तर डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांना गांधीवाद समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत, असे ते आवर्जून सांगत होते.प्रा. रणसुभे म्हणाले, राज्यशास्त्रातील स्त्रीवाद, पर्यावरणवाद, जागतिकीकरण हे लोकांना समजावून सांगण्याचा डॉ. सुमंत यांनी प्रयत्न केला. त्यांनी ‘महाराष्ट्रातील जातविषयक विचार’ या ग्रंथात राज्यातील जातीय राजकारणाचे अपुरेपण स्पष्ट केले. महाराष्ट्राला सैद्धान्तिक राजकारणावर विचार करण्याची सवय डॉ. सुमंत यांनी लावली. ते राजघराण्याशी संबंधित व्यक्ती असूनदेखील सामान्य व्यक्तीच्या राजकारणाबद्दल त्यांना आस्था, आदर होता. त्यांच्यासाठी न्याय मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.सभेत मिलिंद यादव, शिवाजी शिंदे, बी. एल. बरगे, दिलीप पवार, सुभाष वाणी यांची भाषणे झाली. ‘भाकप’च्या शहर शाखेचे सचिव अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकातून डॉ. सुमंत यांची डाव्या विचारांशी असलेली बांधीलकी स्पष्ट केली. जिल्हा सचिव एस. बी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)