शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

साखर कारखान्यांकडे साडेनऊशे कोटी थकीत

By admin | Updated: March 18, 2015 23:59 IST

शेतकरी अडचणीत : कोल्हापूर १७, तर सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांचा समावेश

प्रकाश पाटील - कोपार्डे साखर दरात हंगाम सुरू झाल्यापासूनची घसरण थांबत नसल्याने कारखानदारांपुढे आता एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर देण्यासाठी मोठे संकट निर्माण झाले असून, कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील ३३ कारखान्यांकडे १५ फेब्रुवारी २०१५ अखेर गाळप झालेल्या उसाचे ९४३ कोटी ५९ लाख १६ हजार बिलापोटी शेतकऱ्यांची देणी थकीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हंगाम २०१४-१५ मध्ये शेतकरी संघटनेने आपले ऊस दराचे आंदोलन म्यान केले व कायद्याने एफ.आर.पी. तरी द्या, अशी भूमिका घेतली. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले. मात्र, या हंगामात शेतकरी संघटना यांनी ऊस उत्पादकांना रास्त व किफायतशीर ऊस दर मिळावा, यासाठी आंदोलनापेक्षा कायद्याचा आधार घेत शासनाला वेठीस धरल्याने शासकीय पातळीवर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर ज्या कारखानदारांनी ऊसदर जाहीर केला नाही अशांना नोटिसा बजावल्या. कायद्याच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा व एफ.आर.पी. न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळालाच जबाबदार धरण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. जाहीर करून कारवाई टाळणेच पसंत केले. मात्र, याचवेळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफ.आर.पी. ऐवजी २००० ते २१०० रुपये प्रतिटन जाहीर करून हंगाम सुरू केले.नोव्हेंबर २०१४-१५ चा हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचा प्रतिक्वंटल असणारा ३१०० रुपये दर सतत घसरत असून, आज २२०० रुपयांवर येऊन ठेपला आहे. कारखानदारांनी ओपन टेंडरद्वारे साखर विक्री करण्यास सुरुवात केली असली तरी व्यापारीही दरदिवशी साखरेच्या दराच्या घसरणीमुळे ती खरेदी करण्यास पुढे येईनात. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे कोठून उपलब्ध करायचा हा प्रश्न कारखानदारांपुढे उभा आहे.साखरेच्या दरात प्रचंड घसरण सुरूआहे. एफ.आर.पी.च्या कायद्याचा कोलदांडा लावणाऱ्या शासनाने साखरेच्या दराची हमी का देत नाही. साखर उद्योग मोठ्या प्रमाणात सहकारी आहेत. हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. तो कोलमडला तर शेतकरी, कामगार मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होतील. - चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी-कासारीसर्वाधिक रक्कमसर्वात जास्त थकीत रक्कम जवाहर हुपरीकडे १०३ कोटी २० लाख २२ हजार आहे. त्यापाठोपाठ वारणा ९४ कोटी ६४ लाख ८५ हजार आहे. हे जिल्ह्यात १० लाख मे.टनापेक्षा जास्त उसाचे गाळप करणारे कारखाने आहेत.