शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

साखर कारखान्यांकडे साडेनऊशे कोटी थकीत

By admin | Updated: March 18, 2015 23:59 IST

शेतकरी अडचणीत : कोल्हापूर १७, तर सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांचा समावेश

प्रकाश पाटील - कोपार्डे साखर दरात हंगाम सुरू झाल्यापासूनची घसरण थांबत नसल्याने कारखानदारांपुढे आता एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर देण्यासाठी मोठे संकट निर्माण झाले असून, कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील ३३ कारखान्यांकडे १५ फेब्रुवारी २०१५ अखेर गाळप झालेल्या उसाचे ९४३ कोटी ५९ लाख १६ हजार बिलापोटी शेतकऱ्यांची देणी थकीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हंगाम २०१४-१५ मध्ये शेतकरी संघटनेने आपले ऊस दराचे आंदोलन म्यान केले व कायद्याने एफ.आर.पी. तरी द्या, अशी भूमिका घेतली. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले. मात्र, या हंगामात शेतकरी संघटना यांनी ऊस उत्पादकांना रास्त व किफायतशीर ऊस दर मिळावा, यासाठी आंदोलनापेक्षा कायद्याचा आधार घेत शासनाला वेठीस धरल्याने शासकीय पातळीवर हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर ज्या कारखानदारांनी ऊसदर जाहीर केला नाही अशांना नोटिसा बजावल्या. कायद्याच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा व एफ.आर.पी. न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळालाच जबाबदार धरण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. जाहीर करून कारवाई टाळणेच पसंत केले. मात्र, याचवेळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफ.आर.पी. ऐवजी २००० ते २१०० रुपये प्रतिटन जाहीर करून हंगाम सुरू केले.नोव्हेंबर २०१४-१५ चा हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचा प्रतिक्वंटल असणारा ३१०० रुपये दर सतत घसरत असून, आज २२०० रुपयांवर येऊन ठेपला आहे. कारखानदारांनी ओपन टेंडरद्वारे साखर विक्री करण्यास सुरुवात केली असली तरी व्यापारीही दरदिवशी साखरेच्या दराच्या घसरणीमुळे ती खरेदी करण्यास पुढे येईनात. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे कोठून उपलब्ध करायचा हा प्रश्न कारखानदारांपुढे उभा आहे.साखरेच्या दरात प्रचंड घसरण सुरूआहे. एफ.आर.पी.च्या कायद्याचा कोलदांडा लावणाऱ्या शासनाने साखरेच्या दराची हमी का देत नाही. साखर उद्योग मोठ्या प्रमाणात सहकारी आहेत. हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. तो कोलमडला तर शेतकरी, कामगार मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होतील. - चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी-कासारीसर्वाधिक रक्कमसर्वात जास्त थकीत रक्कम जवाहर हुपरीकडे १०३ कोटी २० लाख २२ हजार आहे. त्यापाठोपाठ वारणा ९४ कोटी ६४ लाख ८५ हजार आहे. हे जिल्ह्यात १० लाख मे.टनापेक्षा जास्त उसाचे गाळप करणारे कारखाने आहेत.