शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

साखर कामगारांची उपेक्षाच

By admin | Updated: October 23, 2014 22:50 IST

आश्वासने हवेतच : वेतन कराराची मुदत संपूनही मागण्यांकडे दुर्लक्ष

प्रकाश पाटील- कोपार्डे -आपल्या श्रमाने साखर उद्योगाला भरभराटी देणारा साखर कामगार साखर कारखानदारांच्या पिळवणुकीला व शासनाच्या दुर्लक्षामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या कामगार संघटनांही दुबळ्या ठरल्याने शासनाचेही साखर कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.राज्यात वस्त्रोद्योगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा साखर उद्योग आहे. या उद्योगात राज्यात सर्वसाधारण दीड लाख साखर कामगार काम करीत आहेत. आपल्या कौशल्याने व श्रमाने महाराष्ट्राच्या प्रामुख्याने ग्रामीण भागाचा आर्थिक कायापालट करण्याचे काम या उद्योगात काम करणाऱ्या साखर कामगारांनी केले आहे. एवढेच नाही तर शासनाला दरवर्षी साडेपाच हजार कोटी रुपये उत्पन्न विविध करांतून देणारा एकमेव उद्योग आहे. आज याच साखर कामगारांना आपल्या विविध मागण्यांसाठी दाती तृण घेऊन कारखानदार व शासनाकडे याचना कराव्या लागत आहेत.साखर कामगारांनी वेतन करारासाठी त्रिपक्षीय वेतन करार मंडळ १८ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या १८ सदस्यीय वेतन मंडळ समितीची एकही बैठक झालेली नाही, की या समितीला शासनाकडून मान्यताही मिळालेली नाही. एप्रिल २०१४ मध्ये वेतन करार मंडळाची मुदत संपली आहे. साखर उद्योगातील साखर कामगार या महत्त्वाच्या घटकाला कारखानदारांबरोबरच शासनानेही दुर्लक्षित ठेवले आहे.सध्या साखर कारखान्यांची २०१४/१५चा गळीत हंगाम घेण्यासाठी धुराडी पेटविली जात आहेत. अलीकडेच राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने साखर कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा दिला आहे. मात्र, साखर कामगार संघटनेचा धाक कमी होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. प्रत्येक साखर कारखान्यांवरील स्थानिक कामगार संघटना या कारखानदारांच्या दावणीला बांधल्या गेल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे कामगारांच्या मागण्यांसाठी न्याय मिळेनासा झाला आहे.वेतनवाढ थकीतएप्रिल २००९ ते मार्च २०१४ साठी साखर कामगारांचा जो वेतन करार झाला, त्यामध्ये सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना १८ टक्के वेतनवाढ एवढी एकच प्रभावी मागणी मान्य करण्यात आली. तीही २०११मध्ये २००९ ते २०११पर्यंतची वेतनवाढ फरक राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी दिलेली नाही. जवळजवळ ५०० कोटी रुपये ही वेतनवाढ कारखानदारांकडे थकीत आहे.टॅगिंगचा प्रश्नही प्रलंबित...फेब्रुवारी २०१४ मध्ये साखर कामगारांनी इस्लामपूर येथे साखर कामगारांचे महाअधिवेशन बोलविले होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थकीत वेतनापोटी कारखान्यांत उत्पादित होणाऱ्या प्रतिपोत्यावर ५० रुपये टॅगिंग लावण्याचे आश्वासन देऊन कामगारांच्या मागण्यांना न्याय देऊ, असे आश्वासन दिले होते; मात्र ते हवेतच विरले.