शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

...अन् दोन वर्षांच्या लढ्याला यश!

By admin | Updated: January 9, 2016 00:45 IST

शासनाच्या निर्णयाने आनंदोत्सव : बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठली

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी म्हणून गेल्या दोन वर्षा$ंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले. भाजप अन् ‘स्वाभिमानी’च्या खासदारांकडे याबाबत ठाम भूमिका मांडली. दहावेळा दिल्लीमध्ये शिष्टमंडळ घेऊन भेटलो. केंद्र सरकारने आज शर्यतीवरील बंदी उठवून बैलगाडी शर्यतप्रेमींना न्याय दिला आहे. दोन वर्षांच्या लढ्याला यश आले. याचा आनंद होत असल्याचे मत अखिल भारतीय बैलगाडी चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष धनाजी शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.शिंदे म्हणाले, अनेक राज्यांमध्ये बैलगाडीच्या शर्यती लोकप्रिय आहेत. मात्र, पेटा या प्राणीमित्र संघटनेने शर्यतीदरम्यान बैलांचे हाल केले जाते, अशी भूमिका मांडल्याने काँग्रेस सरकारने शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, शेतकरी तर आपल्या मुलांप्रमाणे बैलांची काळजी घेतात हे मत आम्ही पटवून द्यायला यशस्वी ठरलो. म्हणूनच आज केंद्र सरकारने हा चांगला निर्णय घेतला आहे.पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू यांच्याबरोबर महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतींना शेतकऱ्यांची पसंती आहे. सातारा जिल्ह्यात तर गावोगावच्या यात्रांमध्ये सुमारे शंभर ठिकाणी बैलगाड्यांचे जंगी आयोजन केले जाते. या शर्यतींसाठी लाखोंची बक्षिसे ठेवली जातात. मात्र, गेली दोन वर्षे या शर्यतीच बंद झाल्याने बैलगाडी शर्यतीप्रेमींच्यात नाराजी झाली होती. याविरोधात शेतकरी रस्त्यावर आले होते. मीही संघटनेच्या माध्यमातून राज्यभर फिरून जागृती करण्याचे काम केले. तब्बल १९ महिन्यानंतर लढ्याला यश ७ मे २०१४ रोजी बैलगाडी शर्यतीवर बंदी आली होती. त्यानंतर नाराज झालेल्या शौकिनांनी आंदोलनाला सुरूवात केली. मात्र, तत्कालीन सरकारने याची दखलही घेतली नाही. मात्र, ८ जानेवारी २०१६ रोजी ही बंदी उठविण्यात आल्याने गावोगावी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.