शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने पाटबंधारेची उच्चांकी वसुलीप्रबोधन मोहिमेस यश : सिंचनाची ९.३४ कोटी, तर बिगरचे २६ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शेतीसाठी आपण नदीचे पाणी वापरतो, त्यातून पीक घेतो व त्यामुळे आपला संसार चालतो. मग आपण पाणीपट्टी भरली ...

कोल्हापूर : शेतीसाठी आपण नदीचे पाणी वापरतो, त्यातून पीक घेतो व त्यामुळे आपला संसार चालतो. मग आपण पाणीपट्टी भरली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाल्याने कोल्हापूर पाटबंधारे विभागाने यंदा उच्चांकी वसुली केली आहे. पाटबंधारे विभागाची यंत्रणाही चांगली राबल्याने वसुलीत भर पडली आहे. सिंचन पाणीपट्टी ९ कोटी ३४ लाख, तर बिगर सिंचन २६ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

इतकी चांगली वसुली झाल्याबद्दल कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांचे वरिष्ठ कार्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले.

गतवर्षी कोरोनामुळे वसुलीस मोठा फटका बसला होता. तो अनुभव पाठीशी असल्याने यावर्षी डिसेंबरपासूनच वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली. यंदा साखर कारखान्यांकडून त्यांच्याकडील थकबाकी व देय बिलांची पूर्तता चांगल्या पद्धतीने झाली. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुलीस कायमच चांगला प्रतिसाद मिळतो; परंतु त्यांना अजूनही पाणीपट्टी भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाने गेल्या दोन वर्षांत प्रबोधनाची मोहीम राबवली. पाणीपट्टीचा हेक्टरी दर १,१२२ रुपये आहे. शंभर गुंठ्याचा एक हेक्टर म्हणजे गुंठ्याला १२ रुपयेच भरायचे आहेत. त्या एका गुंठ्यातून तुम्ही टनभर ऊस काढता. कुठेही गेलात तर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीला लिटरला २० रुपये मोजावे लागतात आणि पाटबंधारे विभाग मात्र १,१२२ रुपयांत तुमच्या एक हेक्टर जमिनीसाठी पाणीपुरवठा करतो. त्यातून पाटबंधारे प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती केली जाते. ही भूमिका शेतकऱ्यांना पटल्याने ते स्वत:हून पाणीपट्टी भरत असल्याचे कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी सांगितले.

...अशी झाली वसुली

सिंचन : ९ कोटी ३४ लाख

बिगर सिंचन : २६ कोटी

गतवर्षीची वसुली

सिंचन : ५ कोटी ५० लाख

बिगर सिंचन : २२ कोटी

...असे आहेत दर

सिंचनासाठी : गुंठ्याला फक्त १३ रुपये

औद्योगिकसाठी : प्रक्रिया उद्योगासाठी : १३ रुपये (प्रतिहजार लिटर)

जिथे पाणी हा कच्चा माल म्हणून वापरले जाते तिथे : २८८ रुपये (प्रतिहजार लिटर)

पिण्यासाठी : एक हजार लिटरसाठी

ग्रामपंचायत : फक्त ३६ पैसे

नगरपालिका : ४३ पैसे

महापालिका : ६० पैसे

मनपाची थकबाकी जास्त..

कोल्हापूर महापालिकेची थकबाकी कायमच असते; परंतु त्यातूनही मार्ग काढण्यात येत आहे. पाटबंधारे विभाग महापालिकेचेही काही देणे लागतो. ती रक्कम थकीत पाणीपट्टीपोटी जमा करून समायोजन करण्याचा प्रयत्न आहे.