शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

‘वारणा’बाबत जनहित याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:01 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत वारणा नळ योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा क्रांतिकारक ...

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत वारणा नळ योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा क्रांतिकारक ठराव करावा, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. याचिका दाखल झाल्यास कुठले दानोळीकर आणि कुठले पुढारी सर्वांच्याच कुरघोड्या बंद होतील, असा टोला देत वारणा योजनेच्या मंजुरीपासून काहीजणांनी टीका केली, तर काहीजणांनी पाण्यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इचलकरंजीकरांनी संयमाची भूमिका घेतली, असेही ते म्हणाले.येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिला महोत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.हाळवणकर म्हणाले, इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुढील ४० ते ५० वर्षे पाणी पुरावे, यासाठी शासनाने वारणा योजना मंजूर केली. मात्र, काहीजणांनी टीका करीत, तर काहीजणांनी राजकारण सुरू केल्याने नदीकाठच्या गावांतून विरोध सुरू झाला. इचलकरंजीवासीयांनी संयमाची भूमिका घेतली. तरीही त्यांचा विरोध कायम आहे. याचा विचार करून सभेमध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. त्यासाठी राजकारण पाहिजे, की पाणी पाहिजे, याचा विचार करावा. कारण प्रत्येक गोष्टीत टीका केली जाते. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या हस्तांतरणावर टीका झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बंद अवस्थेत असल्याची टीका झाली. काही महत्त्वाच्या गोष्टीत राजकारण बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, नगराध्यक्षा अलका स्वामी, महिला व बालकल्याण समिती सभापती राजेशकंवर राठोड, आरोग्य सभापती संगीता आलासे, संध्या बनसोडे, अजित जाधव, अशोक जांभळे, मदन झोरे, मालिकेतील कलाकार दीपाली मुचरीकर, गार्गीसिंह उदावत, आदी उपस्थित होते. यावेळी मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले.युतीमुळे माने वहिनींमध्ये परिवर्तनकार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना माजी खासदार निवेदिता माने यांनी आमदार हाळवणकर व नगराध्यक्षा स्वामी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. त्यावेळी उपस्थितांत युती झाल्याने कौतुक सुरू असल्याची कुजबुज सुरू होती. तोच धागा पकडून आमदार हाळवणकर यांनी शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे माने वहिनींच्यात परिवर्तन झाल्याचा टोला दिला. त्यामुळे सभागृहात जोरदार हशा पिकला.