शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या अधीन राहून विवेकाचा लढा : दाभोलकर

By admin | Updated: August 14, 2016 00:59 IST

युवा संकल्प परिषद : दाभोलकरांचा मारेकरी न सापडल्याने संताप

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होत आली तरी अजून मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. कार्यकर्त्यांच्या मनात संतापाची भावना मनात असतानाही अहिंसक मार्गाने संविधानाच्या अधीन राहून विवेकाच्या मार्गाने लढा सुरूच ठेवू, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिवाजी विद्यापीठ व महावीर महाविद्यालयातर्फे शनिवारी आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय युवा संकल्प’ परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘अंनिस’चे कपिल मुळे, सीमा पाटील, संजय बनसोडे, राज्य कार्यवाह सुनील स्वामी, सचिव निशांत शिंदे उपस्थित होते.हिंसा रुजविण्याऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडून युवकांच्या मनात विवेकाचा विचार रुजविण्यासाठी राज्यभर युवा संकल्प परिषद घेण्यात येत आहे, असे दाभोलकर म्हणाले. तत्पूर्वी सकाळी परिषदेचे उद्घाटन ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्षस्थानी होते. महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, रमेश वडणगेकर उपस्थित होते. यावेळी लोंढे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य लवटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. (प्रतिनिधी)‘विवेकवाहिनी’त सहभागी व्हा समाजात विवेकी विचार रुजविण्यासाठी ‘अंनिस’तर्फे प्रत्येक महाविद्यालयात ‘विवेकवाहिनी’ सुरू केली असून, विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. दाभोलकर यांनी केले. हिंसेला नकार देत मानवतेचा स्वीकार करीत विकासप्रवाहात जोडून घेण्याचे आवाहन त्यांनी केलेपंतप्रधानांना काळी पत्रे पाठविणारडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दि. २० आॅगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तपासयंत्रणेला त्यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत. याचा निषेध म्हणून ‘अंनिस’च्या प्रत्येक गावातील शाखेतर्फे पंतप्रधानांना काळ्या कागदावर लिहिलेली पत्रे पाठविणार आहोत, असे डॉक्टर दाभोलकर म्हणाले.