शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

‘आयजीएम’ होणार उपजिल्हा रुग्णालय

By admin | Updated: June 22, 2016 01:01 IST

हस्तांतरणावर मंत्रिमंडळाची मोहोर : तीन महिन्यांत प्रक्रिया

इचलकरंजी/मुंबई : येथील नगरपालिकेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करून घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. ‘आयजीएम’ला आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे, हे वृत्त शहरात कळताच भाजपच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आयजीएम रुग्णालयाच्या शासनाकडील हस्तांतरणामुळे इचलकरंजी मतदारसंघातील पाच गावे, शिरोळ व हातकणंगले तालुका आणि सीमाभागातील लोकांसाठी सक्षम आरोग्य सेवा मिळेल, अशी अपेक्षा आमदार सुरेश हाळवणकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकात व्यक्त केली आहे. आयजीएम रुग्णालयाकडे ३५० खाटांची सुसज्ज इमारत असली तरी सध्या १७५ खाटांचे रुग्णालय नगरपालिकेकडून चालविण्यात येत होते. रुग्णालयाकडे बाह्यरुग्ण तपासणी उपचारापासून ते फिजिओथेरपीपर्यंत अनेक विभाग सुरू आहेत. सुरुवातीला नगरपालिकेच्या आस्थापनावरील पदांच्या सुधारित आकृतिबंधामुळे रुग्णालयाकडील सर्व पदे अस्थायी स्वरूपात मंजूर करण्यात आली. त्यामुळे अनेक पदे रिक्त होऊन अत्यंत तोकड्या पटसंख्येवर मंत्रिमंडळ निर्णय : महाविद्यालये परवानगीसाठी मुदतवाढराज्यात नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्यासाठीची मुदत १५ जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. त्यासाठी आता अध्यादेश काढण्यात येणार आहे. आघाडी सरकारने नेमलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीने नवीन महाविद्यालयांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे म्हटले होते. त्यानुसार २०१६-१७ मध्ये परवानगी हवी असलेल्या संस्थांनी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत शासनाकडे अर्ज केले होते. अर्जातील त्रुटी दूर करण्याची संधी दिली जाते. त्रुटी दूर करून परवानगीसाठी १५ जूनपर्यंतची मुदत कमी पडते, असा अर्जदार संस्थांचा सूर होता. त्यामुळे ही मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवून शासनाने संस्थांना दिलासा दिला आहे.पीक कर्जासाठी दोन हजार कोटींची हमीआर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पीक कर्जवाटपासाठी २ हजार कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतकऱ्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने कर्जवाटप करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. -वृत्त/ ११ज्यू धर्मीय अल्पसंख्याक!राज्यातील ज्यू धर्मियांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी (झोराष्ट्रीयन) आणि जैन धर्मियांना आधीपासूनच हा दर्जा आहे. हा दर्जा देण्याची मागणी इंडियन ज्युईश फेडरेशनने शासनाकडे केली होती. ज्यू धर्मियांची राज्यातील लोकसंख्या दोन ते अडीच हजार आहे. औद्योगिक, कामगार न्यायालयात शेट्टी आयोगऔद्योगिक व कामगार न्यायालयातील कर्मचाऱ्यांना शेट्टी आयोगाने केलेल्या शिफारशी लागू करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ ९०५ कर्मचाऱ्यांना होणार आहे. न्यायालयीन कर्मचारी संघटनेने तशी मागणी केली होती.