शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महापालिकेच्या दारात शुद्धिकरणाचा ‘स्टंट’

By admin | Updated: February 24, 2015 00:45 IST

शिवसेनेचे आंदोलन : महापौरांच्या राजीनाम्याची व भ्रष्टाचार थांबविण्याची मागणी

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनामा द्यावा, सभागृहाने महापालिका बरखास्तीची मागणी राज्य शासनाकडे करावी, या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेने महापालिकेच्या दारात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. राजर्षी शाहू व महात्मा गांधी यांचे वेश परिधान केलेल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेने महापालिकेच्या दारात शुद्धिकरणाचा होम-हवन केला. महापौरांना राजीनाम्याची सद्बुद्धी यावी, भ्रष्टाचारामुळे बरबटलेली महापालिका शुद्ध व्हावी, यासाठी होम-हवनाच्या नावाखाली शुद्धिकरणाचा ‘स्टंट’ केल्याने शहरवासीयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘महापालिका बरखास्त करा’ ‘महापौर माळवींचा राजीनामा घ्या’ अशा घोषणांनी दुपारी बाराच्या सुमारास महापालिका परिसर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. भ्रष्टाचारात बरबटलेली महापालिका शुद्ध व्हावी, यासाठी मनपाच्या दारावर कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडले. महात्मा गांधी व राजर्षी शाहू महाराज यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला. अर्धा तास शास्त्रशुद्ध मंत्रपठणासह होमविधी सुरू होता. नगरसेवकांनी महापालिका बरखास्तीचा ठराव करून तो राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी शहरप्रमुख शिवाजी जाधव व दुर्गेश लिंग्रज यांनी केली. महापालिका बरखास्त करामहापौर राजीनामा न देणे व सत्ताधाऱ्यांनी बरखास्तीचा ठराव न करणे म्हणजे दोन्हींकडून महापौरांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. भ्रष्टाचारात बरबटलेल्या कारभारातून महापालिकेची पर्यायाने शहरावासीयांची सुटका करण्यासाठी मनपा बरखास्तीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत कार्यकर्त्यांनी यावेळी भाषणांतून व्यक्त केले.