शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीसाठी अभ्यास समिती

By admin | Updated: July 23, 2016 00:57 IST

महिला बालविकासचा निर्णय : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मूळ मागणीला बगलची तक्रार

विश्वास पाटील-- कोल्हापूरअंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये प्रतिवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अशी संघटनांची मागणी असताना सरकारने त्यांना मानधनावरच ठेवून त्यात काही वाढ करता येईल का, याचा अभ्यास करणे म्हणजे मूळ मागणीला बगल दिल्यासारखे असल्याची टीका अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या नेत्यांकडून होऊ लागली आहे. सध्या देण्यात येणारे मानधनही नियमित मिळत नसताना सरकार कशाचा अभ्यास करणार आहे? अशी सामान्य अंगणवाडी कर्मचारी महिलेची प्रतिक्रिया आहे. महिला व बालविकास विभागाने २० जुलैला हा आदेश काढला आहे; परंतु त्यामध्ये या अकरा जणांच्या समितीने नक्की किती दिवसांत या विषयाचा अभ्यास करायचा आहे, याची कोणतेही कार्यकक्षा निश्चित करून दिलेली नाही. अध्यक्ष त्यांना वाटेल तेव्हा या समितीची बैठक बोलावतील असे आदेशात म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केले तेव्हा संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत महिला व बालविकास मंत्र्यांची १२ फेब्रुवारीस बैठक झाली. त्यावेळच्या चर्चेत ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता; परंतु प्रत्यक्षात समिती अस्तित्वात यायलाही सरकारने पाच महिने घेतले. त्यामुळे आता समितीचा अहवाल येऊन त्याची अंमलबजावणी व्हायला किती वर्षे जातील, अशी भीतीही कर्मचाऱ्यांत आहे.अशी आहे समितीअध्यक्ष : प्रधान सचिव, महिला व बालविकास सदस्य : एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त, उपसचिव (एबाविसेयो) महिला व बालविकास विभाग, सहसचिव, नियोजन विभाग, उपसचिव, वित्त विभाग. समितीचे सदस्य सचिव म्हणून एकात्मिक योजनेचे उपायुक्त काम पाहतील. संघटना प्रतिनिधी म्हणून राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम. ए. पाटील ठाणे, ‘आयटक’चे सुकुमार दामले, ‘सीटू’च्या शुभा शमीम, सेविका महासंघाचे भगवान देशमुख लातूर आणि पूर्वप्राथमिक सेविका महासंघाचे राजेंद्र बावके यांचा समावेश..निम्मे आयुष्य रस्त्यावरचमागच्या काँग्रेस सरकारशी दोन वर्षे लढल्यानंतर त्यांनी ९५० रुपये मानधन वाढ मंजूर केली; परंतु ती मिळण्यासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागला. कुशल-अकुशल कोणताही कामगार असो, त्यास किमान १८ हजार रुपये किमान वेतन द्या; तरच त्याला जगणे शक्य होईल, अशी मागणी देशभरातून होऊ लागली आहे. सेविकांचे कामही कायमस्वरूपी आहे; परंतु शासन त्यांची मानधनावर बोळवण करीत आहे. मानधनवाढ मिळावी म्हणून कित्येकांचे निम्मे आयुष्यच रस्त्यावर संघर्षात गेले.