शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

"अलमट्टी" ला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST

बेळगाव : अलमट्टी जलाशयाची पातळी वाढावी यासाठी तसेच या जलाशयाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील ...

बेळगाव : अलमट्टी जलाशयाची पातळी वाढावी यासाठी तसेच या जलाशयाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.

शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की, अलमट्टी जलाशयाची पातळी वाढावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. या जलाशयात आणखी जादा पाणी साठा झाला, तर त्याचा फायदा संपूर्ण उत्तर कर्नाटकाला होईल. याव्यतिरिक्त उत्तर कर्नाटकाला अभिमानास्पद असे जे काम केले जाणार आहे ते म्हणजे अलमट्टी जलाशयाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच मी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आदींची भेट घेतली होती. या जलाशयाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाल्यास केंद्र व राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी मिळणार आहे. ज्यामुळे कर्नाटकचा विकास होऊन जलसंपदा खाते देखील अधिक बळकट होणार आहे. अलमट्टी जलाशय राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाल्यास केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकारकडून ४० टक्के निधीची अर्थसंकल्पात तरतूद होईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले.

गोकाकच्या सुप्रसिद्ध धबधब्याच्या ठिकाणी असलेल्या झुलत्या पुलाच्या जागी ग्लास ब्रीज होणार आहे. या ब्रीजसाठीच्या तरतुदीची आगामी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली जाईल. त्याचप्रमाणे बेळगाव ते सांबरा मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी शेकडो कोटी मंजूर करून घेण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याचे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी फक्त बेळगाव ते बसवन कुडची दरम्यानच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेस मंत्री उमेश कत्ती, आमदार महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.