शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चेन ब्रेक करण्यासाठीच कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:23 IST

कोल्हापूर : प्रशासन म्हणून काळजी घेणे आमची नैतिक जबाबदारीच आहे; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता प्रशासनाने कितीही सुविधा ...

कोल्हापूर : प्रशासन म्हणून काळजी घेणे आमची नैतिक जबाबदारीच आहे; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता प्रशासनाने कितीही सुविधा पुरवल्या तरी त्या कमीच पडणार आहेत. त्यामुळे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठीच कडक लॉकडाऊन केले असून प्रशासनाला साथ द्यावी, अशी हाक पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिली आहे. चांगल्या कामासाठी कोल्हापूरकर कायमच पुढे येतात, येथेही थोडा संयम राखून, कळ सोसून सहकार्य करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आज शनिवारी रात्रीपासून आठ दिवस लागू होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. कोविडची परिस्थिती, लसीकरण, प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजना याबाबतीत माहिती दिली. जिल्ह्यात जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण १० पटीने वाढले. त्यामुळे जिल्ह्यात संसर्गाचा दर ३० टक्क्यांच्या वर गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत या कोरोनाला थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’शिवाय पर्याय नाही. नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

चौकट

मृत्यूदर चिंताजनक

देशातील सर्वाधिक मृत्यूदर असल्याबद्दल सांगताना मंत्री पाटील यांनी तो कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत; पण एकूण मृत्यू झालेल्या २०७२ पैकी १५ टक्के मृत्यू हे परजिल्हा व राज्यातील आहेत. कोल्हापुरात मृत्यू होणाऱ्यांमध्ये २४ तासांत मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण २२ टक्के, ४८ तासांच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण १२ टक्के आहे. एकत्रित आढावा घेतला तर ३४ टक्के मृत्यू हे ४८ तासांच्या आत उपचार न मिळाल्याने झाले असल्याने नागरिकांनी उपचारासाठी वेळ दवडू नये. लवकर निदान, लवकर उपचार केले तर मृत्यू रोखता येऊ शकतात.

चौकट

नोंदणी केेलेल्यांनाच लस

जिल्ह्यात पुणे- मुंबईच्या बराेबरीने राज्यात सर्वाधिक ६२ टक्के इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. लसींची उपलब्धता नसल्याने फक्त दुसरा डोस व ज्येष्ठांना प्राधान्य दिले आहे. नोंदणी केलेल्यांनाच ते दिले जात असल्याने लसीकरण केंद्रावर मेसेज आल्याशिवाय अनावश्यक गर्दी करू नका.

चौकट

जिल्ह्याला लागणारा ऑक्सिजन : ५० ते ६४ टन

जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणारा ऑक्सिजन : ७.५ टन

गोव्याला कोल्हापुरातून जणारा ऑक्सिजन : १० टन

चौकट

आरोग्य यंत्रणा सज्ज

जिल्ह्यातील १४ ऑक्सिजन प्लांटमधून किमान २३ टन ऑक्सिजन मिळणार आहे. ऑक्सिजन बेडची संख्या ३०० वरून ३ हजार केली आहे. व्हेंटिलेटर्सची संख्या १०० वरून ४०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. ५०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर येत्या १५ दिवसांत मिळणार आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठाही १५०० पर्यंत वाढवण्यात आला आहे.