शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

उदगाव टोलनाक्यावर जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

उदगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्रीपासून अनावश्यक प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हाबंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कडक अंमलबजावणी उदगाव ...

उदगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्रीपासून अनावश्यक प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हाबंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कडक अंमलबजावणी उदगाव (ता. शिरोळ) येथील चेक पोस्टवर दिसून आली. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व वाहनांना उदगाव नाक्यावरून परत पाठविण्यात आले. त्यामुळे जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. या परिस्थितीची अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला सूचना दिल्या.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याची उपाययोजना शुक्रवारी सकाळपासून जयसिंगपूर पोलीस ठाण्याने कडकपणे राबविली. वीस ते पंचवीस पोलीस, बॅरिकेट्‌स, बेकर व्हॅन, अ‍ॅब्युलन्स, तीन पोलीस व्हॅन यांसह मोठा फौजफाटा उदगाव नाक्यावर तैनात होता.

सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीला दवाखाना, शासकीय नोकरी व शासनाने सूट दिलेली कारणे सोडून इतर कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये अनावश्यक प्रवेश करणाऱ्यांची हयगय करू नका, असे स्पष्ट बजावले. तसेच उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी दवाखाना व इतर सूट असलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करूनच प्रवेश द्यावा, असे सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

------------------

चौकट -

दवाखान्याची कारणे नित्याचीच

दोन जिल्ह्यांची सीमा असल्याने खासगी कामे करणाऱ्या कामगारांना अडचण झाली आह, तर जास्तीत जास्त नागरिक हे दवाखान्याची कारणे सांगून प्रवेश मिळवित आहेत. काहींची कारणे ही, शेती नदीपलीकडे आहे, अशी आहेत. या सर्व कारणांमुळे पोलिसांची पंचाईत होत आहे.

--------------------

कोट -

नागरिकांनी शासनाच्या नियमावलींचे योग्य पालन करावे. अत्यावश्यक कारणे वगळता इतर कोणत्याही कारणाने प्रवेश दिला जाणार नाही. अनावश्यक कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना परत माघारी फिरावे लागेल.

- दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर

फोटो - २३०४२०२१-जेएवाय-०५, ०६ फोटो ओळ -

उदगाव (ता. शिरोळ) येथील चेकपोस्टवर बॅरिकेट्‌स लावण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना कागदपत्रांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. (छाया-अजित चौगुले, उदगाव)