शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

सहकारमंत्र्यांच्या दारात गुरुवारपासून ठिय्या

By admin | Updated: February 7, 2015 00:23 IST

प्रभाकर देशमुख : ऊस दरासाठी जनहित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन

कोल्हापूर : उसाचा गळीत हंगाम संपत आला तरी अजून शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाहीत, साखर कारखानदारांबरोबरच सरकारचीही संवेदना गेली असून, त्यांना जाग आणण्यासाठी गुरुवार (दि. १२) पासून दोन दिवस सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली. त्यांनी ऐकले नाहीतर कारखानदारांबरोबर राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देण्यासाठी १४ फेबु्रवारीला सहकारमंत्र्यांच्या दारातून अंबाबाईला लोटांगण घालत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंधरा वर्षे दोन्ही काँग्रेसच्या जुलूमशाहीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने युतीला सत्तेवर बसवले पण त्यांनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले. गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले तरी एफ.आर.पी.प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत. याबाबत दोनवेळा मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांना भेटलो, पण आश्वासनापलीकडे काहीच हातात पडले नाही. गेले महिनाभर सोलापूर जिल्ह्यात विविध आंदोलने सुरू आहेत. साखर आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन, मोर्चे, पालकमंत्र्यांच्या घरासमोर बोंबा-बोंब आंदोलन, हुतात्मा पुतळ्यांसमोर उघडे आंदोलन, भीक मांगो आंदोलनासह ‘हलगी नाद’ आंदोलन करून या सरकारचे कान उघडण्याचा प्रयत्न केला, पण झोपेचे सोंग घेतलेल्या कारखानदार व सरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकू जात नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला. दखल घेतली नाही तर तेथूनच लोटांगण घालत अंबाबाई मंदिराकडे येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आधी दर जाहीर मगच कोयताया हंगामात सरकारने शेतकऱ्यांना फसविले आहे. आता आम्ही शहाणे झाले असून, पुढील हंगामात आधी दर जाहीर करा मगच उसाला कोयता लावण्यास परवानगी देऊ, असा इशारा देशमुख यांनी दिला. दुकानात पुडी बांधायच्या आधी पैसेकिराणा मालाच्या दुकानात मालाची पुडी बांधायच्या आधी दुकानदार पैसे घेतो. मग उसाबाबतच असे का होते, ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसांनी आम्ही पैसे मागतो तरीही देत नाही, हा कसला न्याय म्हणायचा, असा सवाल देशमुख यांनी केला. कारखानदारांविरोधात शड्डू ठोकणारा संचालकप्रभाकर देशमुख हे मोहोळ पंचायत समितीचे सदस्य व भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. एका कारखान्याचे संचालक असताना शेतकऱ्यांसाठी कारखानदारांविरुद्ध शड्डू ठोकणारे ते एकमेव संचालक असतील.